शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टंचाईसदृश परिस्थितीवर महिनाअखेर उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:32 IST

नाशिकसह राज्यातील १७० तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाली असून, टंचाईग्रस्त तालुक्यांचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या ३१ आॅक्टोबर अखेर पीक कापणी प्रयोग राबवून टंचाईग्रस्त परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : राज्यात १७० तालुक्यांत कमी पर्जन्यमान

नाशिक : नाशिकसह राज्यातील १७० तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाली असून, टंचाईग्रस्त तालुक्यांचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या ३१ आॅक्टोबर अखेर पीक कापणी प्रयोग राबवून टंचाईग्रस्त परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नाशिक जिल्ह्णाचे विकास प्रकल्प व योजनांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील कमी पर्जन्यमान झालेल्या तालुक्यांना मदतीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.राज्यात ७७ टक्के पर्जन्यमान झाले असले तरी, त्याबाबतची परिस्थिती प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. काही ठिकाणी कमी पाऊस पडूनही पिकांची परिस्थिती चांगली आहे तर काही ठिकाणी पाऊस अधिक पडूनही जलसाठा कमीझाला आहे. त्यामुळे तूर्त टंचाईची परिस्थिती दिसू लागली असून, याचा वेगवेगळ्या पातळीवरून आढावा घेतला जात आहे. आवश्यकता भासेल तेथे राज्य सरकार टंचाईचा सामना करण्यासाठी मदत करेल, असे त्यांनी जाहीर केले.केंद्राचे पथक येणारकमी पर्जन्यमान झालेले १७० तालुके दुष्काळसदृश व टंचाईग्रस्त घोषित करण्यासाठी ३१ आॅक्टोबर अखेर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्राचे पथक राज्यात येऊन पाहणी करेल व दुष्काळी परिस्थितीबाबत आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेणार अहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रwater scarcityपाणी टंचाई