शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अलबत्या-गलबत्यामधील वैभव मांगलेंच्या पडद्यामागील कलाकाराच्या बॅगा छूऽऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:43 IST

विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला.

ठळक मुद्देचोरीच्या घटनेने कला क्षेत्रात एकच खळबळकालिदास कलामंदिराची वास्तू उत्कृष्ट; सुरक्षाव्यवस्था निकृष्ट

नाशिक : चेटकिनीची भूमिका साकारणाऱ्या वैभव मांगले यांच्या अलबत्या-गलबत्या या गाजलेल्या बालनाटकाचा प्रयोग सुरू असताना नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या वाहनतळात उभ्या असलेल्या मांगले यांच्या टीमच्या बसमधून दोन बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला. या चोरीच्या घटनेने कला क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.नाशिकला गुरूवारी अलबत्या गलबत्या हा धमाल उडविणारा नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानकपणे स्टेजजवळ वाहनतळात उभ्या असलेल्या बसमध्ये चोरटा शिरला आणि त्याने भर दुपारी दोन बॅगा पळवून नेल्या. चोरट्याचा हा प्रताप ‘तीसºया डोळ्यात’ कैद झाला असला तरी त्या डोळ्याच्या चित्रीकरणाची गुणवत्ता नसल्यामुळे पोलिसांना चोरट्याचा माग काढणे अवघड झाले असून चोरटा मोकाट आहे. या घटनेने पाहुण्या कलावंतांसह स्थानिक कलाक्षेत्रामध्येही नाराजी पसरली आहे.नाटकाच्या प्रयोगात दंग असलेल्या वैभव मांगले यांच्या टीमला गुरूवारी आलेला हा अनुभव अत्यंत वाईट स्वरूपाचा तर आहेच; मात्र नाशिकमधील ‘स्मार्ट झालेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या सुरक्षेविषयीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. अलबत्या गलबत्यामधील पडद्यामागील कलाकार वैभव शिंदे तसेच बसचालकाची बॅग चोरट्याने लांबविली. सुदैवाने या बॅगांमध्ये मोठी रक्कम नव्हती; मात्र पारपत्र (पासपोर्ट) मोबाईलसह अन्य महत्त्वाच्या वस्तू चोरीस गेल्या आहेत. नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी याप्रकरणी तीव्र नाराजी दर्शविली असून महापालिका प्रशासन सुरक्षाव्यवस्थेबाबत चूक करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाकवी कालिदास कलामंदिराची वास्तू जरी उत्कृष्ट असली तरी येथील सुरक्षाव्यवस्था निकृष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकmarathiमराठीartकलाvaibhav mangleवैभव मांगलेtheftचोरीPoliceपोलिस