शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

टमाट्याला कवडीमोल भाव : तोडणी बंद करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:22 AM

बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्ट्यात सध्या टमाट्याला घरातून पैसे टाकूनही केवळ तीन ते चार रुपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टमाट्याची तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे.

औंदाणे : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्ट्यात सध्या टमाट्याला घरातून पैसे टाकूनही केवळ तीन ते चार रुपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टमाट्याची तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे.  येथील ग्रामीण भागात औंदाणे, तरसाळी, भाक्षी, मुळाणे, मुंजवाड परिसरातील तळवाडे दिगर, किकवारी, दसाणे, केरसाणे, मोरकुरे, पठावे, डांगसौंदाणे, जोरण आदी गावांतील शेतकºयांनी टमाट्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टमाट्यास अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. या बाजारभावात शेतकºयाचा खर्चसुद्धा निघत नाही.  शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कारण टमाट्याला औषध फवारणी, बांधणी, मिल्चिंग पेपर, तसेच मांडव व तोडणी असा एकरी एक लाख रुपये खर्च करूनही आज टमाट्याला तीन-चार रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे शेतकºयांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे टमाटे तोडून बाजारात विक्रीसाठी नेले असता त्याचा खर्च-सुद्धा निघत नाही व उलट शेतकºयांना पदरचे पैसे भरावे लागतात. गेली दोन-तीन वर्षं टमाटे पिकामध्ये शेतकºयांना फटका बसत आहे. हल्ली कोणत्याही कारणाने टमाट्याला भाव मिळत नाही. या पिकाला खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. टमाटे हे नाशवंत पीक असल्यामुळे ते साठवून ठेवता येत नाही. बहुतेक शेतकºयांनी टमाट्याची शेतातील तोडणी बंद केली आहे. त्यामुळे शेतात टमाट्याचा खच पडला आहे.सध्या तळवाडे दिगर व परिसरातील टमाटे उत्पादक शेतकरी आपला माल सूरत, नवापूर, नंदुरबार, मालेगाव, बिल्ली मोरा आदी शहरात विक्र ीसाठी नेत आहे. मात्र, तिथे प्रतिक्रेट्स (जाळी) सरासरी ५० ते ६० दर मिळत असून, माल नेण्याचे भाडे ४५ ते ५० रु पये त्यात तोलाई, वाराई, हमाली जाते.शेतकºयांना टमाटे तोडणीसाठी १५ रु पये प्रतिक्रेट्स खर्च येतो म्हणजे ते बाजारात नेण्यासाठी ५० ते ६० रुपये खर्च येतो. तेवढाच भाव मिळत असल्यामुळे बाकीचा खर्च घरातून टाकण्याची वेळ आज टमाटे उत्पादक शेतकºयांवर आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी