शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

टमाटा २ रूपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 3:17 PM

४० रूपये जाळी,  बॉर्डर बंदमुळे परदेशात निर्यात बंद,शेतकरी चिंतातूर

ठळक मुद्दे४० रूपये जाळी  बॉर्डर बंदमुळे परदेशात निर्यात बंद,शेतकरी चिंतातूर

संदीप झिरवाळपंचवटी :  गेल्या काही वर्षभरापुर्वी ५० ते ६० रूपये प्रतिकिलो असा बाजारभाव गाठणाऱ्या टमाटा मालाला नाशिक बाजारसमितीत प्रति २० किलो जाळीला केवळ ४० रूपये (२ रूपये प्रति किलो) असा मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने नाशिक जिल्हयातील शेकडो टमाटा उत्पादक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातसह अन्य राज्यात स्थानिक टमाटा माल सुरू झाल्याने तसेच राज्यातील काही जिल्हयातील टमाटा मुंबई व उपनगरात मोठया प्रमाणात विक्र ीसाठी दाखल होत असल्याने बाजारभाव कोसळले असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून टमाटा मालाला २ ते ३ रूपये किलोच्या पुढे बाजारभाव नसल्याने काही टमाटा उत्पादक शेतकºयांनी टमाटा खुडणे बंद करून टमाटयाचे उभे पिक जनावरांसाठी सोडून दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील काही ठिकाणच्या भागात नाशिकच्या बाजारसमितीतून पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात थांबली आहे. तर गेल्या वर्षभरापासून भारत पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने नाशिकच्या बाजारसमितीतून पाकिस्तान, बांग्लादेशात टमाटा माल पाठविणे बंद केले आहे. सध्या गुजरात राज्यातील वापी पर्यंत टमाटा माल जात आहे. याशिवाय मुंबईकडे घोटी, नाशिक, वाडा परिसरातून टमाटा मालाची निर्यात केली जात आहे. व्यापारी वर्गाकडून टमाटा खरेदी केली जात असला तरी टमाटा मालाला उठाव कमी असल्याने टमाटा खरेदी करायला कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. नाशिक बाजारसमितीत काही दिवसांपासून टमाटयाच्या २० किलो जाळीला ४० ते ६० रूपये असा अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. योग्य बाजारभाव मिळत नाही तसेच लागवड व दळणवळण खर्च निघत नसल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. किरकोळ व आठवडे बाजारात १० रूपयात दिड ते दोन किलो दराने ग्राहकांना टमाटा उपलब्ध होत आहे. सध्या टमाटा मालाची आवक आहे तर उठाव नाही. त्यातच अन्य बाजारपेठेतून माल खरेदी करून तो दुसºया बाजारपेठेत रवाना करण्यासाठी मोठा दळणवळण खर्च लागतो. परिणामी व्यापारी देखिल स्थानिक बाजारपेठेतून टमाटा खरेदी करून अन्यत्र पाठवित असल्याने पैशांची व वेळेचीही बचत होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती