शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

राजकारणाचे शुद्धीकरण आजची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 01:11 IST

ओझर टाउनशिप : राजकारणाचे शुद्धीकरण आजच्या काळाची गरज असून, राजकारणातला सेवाभाव लुप्त पावला आहे. जनतेचा सेवक स्वत:ला मालक समजू लागला आहे. मालकी दृष्टिकोन आला की तेथे भ्रष्टाचार सुरू होतो. आपल्या देशाला सर्वाधिक शक्तिशाली बनवायचे असेल तर खऱ्या लोकशाहीचे दर्शन घडवावे लागेल त्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.

ठळक मुद्देशांतीगिरीजी महाराज : म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याची सांगता

ओझर टाउनशिप : राजकारणाचे शुद्धीकरण आजच्या काळाची गरज असून, राजकारणातला सेवाभाव लुप्त पावला आहे. जनतेचा सेवक स्वत:ला मालक समजू लागला आहे. मालकी दृष्टिकोन आला की तेथे भ्रष्टाचार सुरू होतो. आपल्या देशाला सर्वाधिक शक्तिशाली बनवायचे असेल तर खऱ्या लोकशाहीचे दर्शन घडवावे लागेल त्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज यांच्या मातोश्री म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओझरच्या जनशांतिधाम येथे सुरू असलेल्या जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याची रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी उपस्थित भाविकांना धर्म उपदेश करताना स्वामी शांतिगिरी महाराज बोलत होते. यावेळी त्यांनी बाबाजींच्या अनेक आठवणी सांगीतल्या. जगद्गुरू बाबाजींच्या दिव्य परंपरा समाजासाठी वरदानकारी ठरत असून जपानुष्ठानाच्या माध्यमातून भाविकांच्या जीवनाला योग्य दिशा मिळत आहे. प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा. पती आणि पत्नी संसररूपी रथाची दोन चाके असून यापैकी एकानेही असहकार दाखवला तर काय होईल ? म्हणून एकविचाराने संसार करा, अध्यात्माची , संत- संगतीची जोड असल्यास संसार आनंदी होऊ शकतो. असेही ते म्हणाले. राहुल शिंदे यांनी सदगुरु भक्तीपर गीते सादर करूण भाविकांना मंत्रमुग्ध केले. गायक रोशन बागल यांनीही सलग आठवडाभर भक्तीगीतांची सेवा केली. लक्षवेधी पालखी मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरले. स्वामी शांतिगिरीजी महाराज मिरवणुकीत सहभागी झाल्याने भाविकांचा उत्साह वाढला. यावेळी हजारो महिलांच्या जपानुष्ठानाची सांगता जय बाबाजींच्या प्रचंड जयघोषात झाली.  यावेळी जनशांती धामातील देवीदेवतांच्या आणि बाबाजींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.