शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राजकारणाचे शुद्धीकरण आजची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 01:11 IST

ओझर टाउनशिप : राजकारणाचे शुद्धीकरण आजच्या काळाची गरज असून, राजकारणातला सेवाभाव लुप्त पावला आहे. जनतेचा सेवक स्वत:ला मालक समजू लागला आहे. मालकी दृष्टिकोन आला की तेथे भ्रष्टाचार सुरू होतो. आपल्या देशाला सर्वाधिक शक्तिशाली बनवायचे असेल तर खऱ्या लोकशाहीचे दर्शन घडवावे लागेल त्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.

ठळक मुद्देशांतीगिरीजी महाराज : म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याची सांगता

ओझर टाउनशिप : राजकारणाचे शुद्धीकरण आजच्या काळाची गरज असून, राजकारणातला सेवाभाव लुप्त पावला आहे. जनतेचा सेवक स्वत:ला मालक समजू लागला आहे. मालकी दृष्टिकोन आला की तेथे भ्रष्टाचार सुरू होतो. आपल्या देशाला सर्वाधिक शक्तिशाली बनवायचे असेल तर खऱ्या लोकशाहीचे दर्शन घडवावे लागेल त्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज यांच्या मातोश्री म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओझरच्या जनशांतिधाम येथे सुरू असलेल्या जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याची रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी उपस्थित भाविकांना धर्म उपदेश करताना स्वामी शांतिगिरी महाराज बोलत होते. यावेळी त्यांनी बाबाजींच्या अनेक आठवणी सांगीतल्या. जगद्गुरू बाबाजींच्या दिव्य परंपरा समाजासाठी वरदानकारी ठरत असून जपानुष्ठानाच्या माध्यमातून भाविकांच्या जीवनाला योग्य दिशा मिळत आहे. प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा. पती आणि पत्नी संसररूपी रथाची दोन चाके असून यापैकी एकानेही असहकार दाखवला तर काय होईल ? म्हणून एकविचाराने संसार करा, अध्यात्माची , संत- संगतीची जोड असल्यास संसार आनंदी होऊ शकतो. असेही ते म्हणाले. राहुल शिंदे यांनी सदगुरु भक्तीपर गीते सादर करूण भाविकांना मंत्रमुग्ध केले. गायक रोशन बागल यांनीही सलग आठवडाभर भक्तीगीतांची सेवा केली. लक्षवेधी पालखी मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरले. स्वामी शांतिगिरीजी महाराज मिरवणुकीत सहभागी झाल्याने भाविकांचा उत्साह वाढला. यावेळी हजारो महिलांच्या जपानुष्ठानाची सांगता जय बाबाजींच्या प्रचंड जयघोषात झाली.  यावेळी जनशांती धामातील देवीदेवतांच्या आणि बाबाजींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.