शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:36 PM

राजापूर परिसरातील विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके घेतले असून, पाण्याअभावी शेतकऱ्यांना ही पिके साोडून देण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे राजापूर परिसरात विहिरींनी गाठला तळ ; पाणीटंचाईचे संकट गडद; भटकंती सुरू

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्वेकडील व डोंगराळ भागात असलेल्या राजापूर परिसरातील विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके घेतले असून, पाण्याअभावी शेतकऱ्यांना ही पिके साोडून देण्याची वेळ आली आहे.पाण्याअभावी शेतात उभी पिके सुकू लागली आहेत. राजापूरला दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही विहिरींना एक ते दोन फुटांपर्यंतच फक्त पाणी येत आहे. एक ते दोन फूट पाण्यामध्ये पिकाला किती पाणी भरायचे व घरी किती वापरायचे, असा प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या कोबी, फ्लॉवर व गहू, हरभरा पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रोपे खराब झाल्याने कांदा लागवड कमी प्रमाणात झालेली आहे. त्यात हवामान बदलामुळे औषध फवारणीचा खर्च भरमसाठ झाला आहे. मात्र पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती शेतकºयांनी सतावत आहे.राजापूर हे गाव तालुक्यातील सर्वात उंच डोंगराळ भागात असल्याने दरवर्षी या गावाला कितीही पाऊस झाला तरीजानेवारी व फेब्रुवारीपासून विहिरी तळ गाठतात. यामुळे शेतकºयांची चिंता वाढली असून, पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ आलीआहे.- विठ्ठल वाघ,शेतकरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रwater shortageपाणीकपात