शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

९० हजार भाविकांची बसने त्र्यंबकवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:26 AM

वण महिन्यातील तिसऱ्या सोमवारचे धार्मिक महत्त्व मानले जात असल्यामुळे दरवर्षी तिसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी असते. जिल्ह्यातून तसेच परराज्यातून या दिवशी भाविक नाशिकमध्ये दाखल होत असल्यामुळे त्यांच्यासाठी महामंडळाकडून ३०० बसेसचे नियोजन करण्यात आले होते.

नाशिक : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारचे धार्मिक महत्त्व मानले जात असल्यामुळे दरवर्षी तिसºया श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी असते. जिल्ह्यातून तसेच परराज्यातून या दिवशी भाविक नाशिकमध्ये दाखल होत असल्यामुळे त्यांच्यासाठी महामंडळाकडून ३०० बसेसचे नियोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १८ ते सोमवार, दि. १९ रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून सुमारे ९० हजार भाविकांनी बसने प्रवास केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.श्रावण महिन्यातील तिसºया सोमवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी रविवारी सकाळपासूनच महामंडळाने ३०० बसेसचे नियोजन केले होते. शहरातील ईदगाह मैदान येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या बसस्थानकातून त्र्यंबकेश्वरकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याबरोबर शहरातील नाशिकरोड, भगूर, पंचवटी, सातपूर येथील स्थानकांमधूनदेखील बसेस सोडण्यात आल्यामुळे ईदगाह मैदानावरील ताण काही प्रमाणात कमी झाला. रविवारी दुपारनंतर ईदगाह मैदान येथून सोडण्यात आलेल्या बसेस सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होत्या. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे ९० हजार भाविकांनी बसने प्रवास केल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.रविवारी सायंकाळी भाविकांचा ओघ सुरू झाला आणि रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांची स्थानकावर गर्दी होत होती. त्र्यंबकेश्वरला थेट बस जात असल्याने भाविकांनीदेखील बसनेच जाण्याला प्राधान्य दिले. रविवारी पहाटेपर्यंत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातल्यानंतर सोमवारी पहाटेपासून भाविकांना परतीचे वेध लागले होते. परतीसाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने ईदगाह मैदानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यंदा प्रवासी घटलेदरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वरला जाणाºया भाविकांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. साधारणपणे दुसºया आणि तिसºया सोमवारी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यंदा मात्र प्रवासी संख्या कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरवर्षी साधारणपणे एक लाखाच्या पुढे भाविक नाशिकमधून त्र्यंबकेश्वरकडे जातात. परंतु फक्त ईदगाह स्थानकातून २० ते २५ हजार भाविकांनी प्रवास केला.सलग सुट्यांमुळे प्रवासी कमीदरवर्षी होणाºया गर्दीचा उच्चांक लक्षात घेता यंदा तुलनेत भाविकांची संख्या कमीच होती. सलग आलेल्या शासकीय सुट्यांमुळे भाविकांनी सुट्यांमध्येच दर्शन घेतल्याचे बोलले जाते तर काही भाविक तीन ते चार दिवसांपासूनच मुक्कामी होते. त्यामुळेदेखील बसने प्रवास करणाºया भाविकांनी संख्या कमीच होती. रविवार सायंकाळपर्यंत साधारणपणे ३० हजार, तर दुसºया दिवशीदेखील १७ हजार भाविकांनी प्रवास केला. तर तितक्याच संख्येने भाविकांनी परतीचा प्रवास केला. ही आकडेवारी केवळ ईदगाह मैदान येथील स्थानकातून असून अन्य स्थानकातूनदेखील भाविकांनी त्र्यंबकेश्वरच्या बसने प्रवास केला. या सर्व स्थानकामंधून जवळपास लाखभर भाविक त्र्यंबककडे रवाना झाले.सलग दोन दिवस नाशिकमधून मोठ्या प्रमाणात भाविकांची वाहतूक करण्यात आली. या कालावधीत कुठेही भाविकांना गर्दीचा त्रास झाला नाही शिवाय भाविकांनी शक्यतो बसूनच प्रवास करावा यासाठी दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध करून दिली जात होती. विभाग नियंत्रक नितीन मंैद आणि विभागीय वाहतूक अधिकारी उत्तम पाटील यांनी केलेल्या नियोजनानुसार नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी काटेकोर सेवा बजावली.- व्ही. व्ही. निकम, सहायक वाहतूक अधिकारी.

टॅग्स :state transportएसटीtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर