शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

एकलहरे केंद्रातील तिन्ही निर्मिती संच कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:40 IST

मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले

एकलहरे : मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले असून, त्याद्वारे राज्याची विजेची मागणी पूर्ण करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकलहरे येथील  एकच संच कार्यान्वित करण्यात आला होता.कोळशाची उपलब्धता, विजेचे दर परवडत नसल्याच्या कारणावरून सरकारने एकलहरेच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी हात अखडता घेतला होता. तीनपैकी एकच संच सुरू ठेवण्यात आल्याने येथील कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकलहरेच्या २१० मेगावॅट क्षमतेच्या ३ संचांपैकी संच क्रमांक ४ व ५ मधून पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन सुरू ठेवून संच क्रमांक ३ स्टँडबाय ठेवण्यात आला होता. मात्र आता उन्हाळ्यामुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे, त्यामुळे एकलहरे येथील स्टँडबाय ठेवलेला संच क्रमांक तीनदेखील सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या एकलहरेचे तीनही संच पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करीत आहेत. एकलहरे औष्णिक वीज केंद्रात संचालक संचलनाचे पाच सूत्री कार्यक्रमानुसार निरनिराळ्या धेयधोरणांची अंमलबजावणी, नवनवीन संकल्पना, संवादात्मक कार्यक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात येते.१० जानेवारी २०१९ पासून नाशिक औष्णिक वीज केंद्रातील एकच संच कार्यान्वित होता. विजेच्या वाढत्या मागणीमुळे दिनांक २८ मार्च रोजी सकाळी २१० मेगावॅटचा संच क्रमांक ५ संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला व तीनपैकी दोन संच सुरू झाले होते. यापूर्वी कमी विजेच्या मागणीमुळे सदर संच संपूर्ण क्षमतेने चालवता येत नव्हते, तसेच इतर संच उपलब्ध असूनसुद्धा सुरू करता येत नव्हते. नाशिक औष्णिक विद्युत केंद्रावर सातत्याने एक किंवा दोन संच चालू असायचे, परंतु आता मात्र तिन्ही संच बऱ्याच दिवसांनी पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत.  - उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, एकलहरे केंद्र

टॅग्स :electricityवीजNashikनाशिकPower Shutdownभारनियमन