शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

कृषी उत्पादनासाठी त्रिसूत्रीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:49 PM

यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

ठळक मुद्देदादा भुसे : कृषिदिन, कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

नाशिक : यंदाच्या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करून बळीराजाला समाधानी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे कोणे येथे आयोजित कृषिदिन आणि ‘कृषी संजीवनी सप्ताह’ शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा कृषी अधीक्षक संजय पडवळ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, ‘आत्मा’ उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तहसीलदार दीपक गिरासे, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना भुसे म्हणाले खरीप हंगामात कोणत्याही जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासणार नाही. कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयाने एकदा अर्ज केला अन् त्यावर्षी त्याला लाभ मिळू शकला नाही तर पुढील वर्षी त्या शेतकºयास अर्ज करण्याची गरज भासणार नाही अशा प्रकारची यंत्रणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असताना सर्वांचा पोशिंदा बळीराजाच होता. या प्रतिकूल परिस्थितीत अडचणींचा सामना करून शेतकºयांनी सर्वांपर्यंत अन्नधान्य, भाजीपाला पोहोचविला. १ ते ७ जुलै दरम्यान होणाºया सप्ताहात शेतकºयांच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही ते म्हणाले. याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. भुसे यांच्या हस्ते विमल आचारे, दिनकर कडाळे, सीताबाई मुळाणे, वासंती कांबळे, भास्कर कांबळे, मधुसूदन भारस्कर, विश्वास चव्हाण या शेतकºयांचा सत्कार करण्यात आला.यांत्रिक पद्धतीने भातलागवडकार्यक्रमापूर्वी दादा भुसे यांनी बांधावर जाऊन शेतकºयांशी संवाद साधला. धोंडेगाव येथील कासुबेंडकुळे व त्यांच्या पत्नी चंद्रभागा बेंडकुळे यांच्या घरी अचानक भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या जोडप्याच्या रूपात साक्षात विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घडल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.किशोर पवार या शेतकºयाच्या शेडनेडची पाहणी केली. हिरामण ठाकरे या शेतकºयाने उभारलेल्या शेततळे व फळबाग याची पाहणी त्यांनी केली. एकनाथ भोये यांच्या शेतात यांत्रिकी पद्धतीने भातलागवडीचा शुभारंभ करण्यात आला. दादा भुसे यांनी स्वत: चिखलात उतरून मशीनची माहिती जाणून घेतली व भातलागवडदेखील केली.

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीGovernmentसरकार