शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

तीन महिने पत्र पडून : नागरिकांचे मात्र हाल सुरू ‘आधार यंत्र’ आणायला प्रशासनाला नाही वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:26 AM

नाशिक : नागरिकाला आधार कार्डासाठी सक्ती केली जात असताना केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना दिवसभर एकीकडे रांगा लावाव्या लागत असताना जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ३५ आधार यंत्रे नाशिक जिल्ह्याला देण्याची तयारी यूआयडीने दर्शवूनही जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून आधार यंत्रे जळगावी पडून असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचाºयांना वेळ नसल्याचे कारणअंगठे व माहिती गायब झाल्याने नागरिक हवालदिल

नाशिक : शासनाकडून प्रत्येक नागरिकाला आधार कार्डासाठी सक्ती केली जात असताना आधार केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना दिवसभर एकीकडे रांगा लावाव्या लागत असताना जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ३५ आधार यंत्रे नाशिक जिल्ह्याला देण्याची तयारी यूआयडीने दर्शवूनही जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून आधार यंत्रे जळगावी पडून असल्याचे वृत्त आहे. आधार यंत्र आणण्यासाठी अधिकारी, कर्मचाºयांना वेळ नसल्याचे त्यामागे कारण दिले जात आहे.काही वर्षांपूर्वी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या खासगी कंपन्यांच्या आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड काढले. परंतु गेल्या वर्षी आधार अपडेशन करण्याच्या प्रक्रियेत शासनाने सर्व खासगी कंपन्यांकडून आधारचे काम काढून घेत शासनाकडूनच आधार यंत्र पुरविण्याचे ठरविले. यात हजारो नागरिकांनी यापूर्वी आधार काढूनही त्यांचे अंगठे व माहिती गायब झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.शासनाने निश्चित केलेले आधार केंद्रांची संख्या जिल्ह्यात जेमतेम १२२ इतकी असून, दिवसाकाठी फक्त ३० ते ३५ लोकांचीच आधारची नोंदणी होत असल्याने नागरिकांना थेट दोन, दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार तसेच निमशासकीय व खासगी कंपन्यांनीही आता प्रत्येकाला आधार कार्ड सक्तीचे व अनिवार्य केले असल्यामुळे आधार यंत्रांच्या अपुºया संख्येमुळे आधारची गरज असलेल्या नागरिकांची आर्थिक पिळवणूकही होत असल्याच्या तक्रारी आहेत.अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्याला दिल्लीच्या यूआयडीने पुरविलेले आधार यंत्रे अतिरिक्त ठरले आहेत. नाशिक जिल्ह्याची असलेल्या मागणीचा विचार करता ३५ यंत्रे जळगावने नाशिकला देण्याची तयारी दर्शविली असून, तसे पत्रही नाशिक जिल्हा प्रशासनाला तीन महिन्यांपूर्वी पाठविले आहे.