शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तीनशे एमसीएफटी जादा पाणी; तरीही जलसंकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 02:05 IST

शहराला एक नव्हे तर तब्बल तीन धरणांतून पाणीपुरवठा होत असतानाही केवळ महापालिकेचे चुकीचे नियोजन आणि जलसंपदा विभागाची अतिदक्षता यामुळे नाशिककरांवर जलसंकट घोंघावू लागले आहे. दारणा नदीतील पाणी दूषित असल्याने ते घेता येत नाही तर गौतमी गोदावरी तसेच कश्यपीतील पाणी धरणातील खडकामुळे गंगापूर धरणातील जलविहिरीपर्यंत पोहचू शकत नाही, अशी अवस्था असून त्यामुळे मुबलक पाणी असतानाही पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देलवकरच कपातीचा निर्णय : चुकीच्या नियोजनाचा फटका

नाशिक : शहराला एक नव्हे तर तब्बल तीन धरणांतून पाणीपुरवठा होत असतानाही केवळ महापालिकेचे चुकीचे नियोजन आणि जलसंपदा विभागाची अतिदक्षता यामुळे नाशिककरांवर जलसंकट घोंघावू लागले आहे. दारणा नदीतील पाणी दूषित असल्याने ते घेता येत नाही तर गौतमी गोदावरी तसेच कश्यपीतील पाणी धरणातील खडकामुळे गंगापूर धरणातील जलविहिरीपर्यंत पोहचू शकत नाही, अशी अवस्था असून त्यामुळे मुबलक पाणी असतानाही पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. या धरणालगत गंगापूर आणि गौतमी गोदावरी तसेच कश्यपी धरण बांधण्यात आले आहे. या दोन्ही छोट्या धरणांचे पाणी गंगापूर धरणातच येत असल्याने महापालिका निर्धास्त असते. यंदा तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूरऐवजी दारणा धरणातूनदेखील पाणी आरक्षण वाढवून देण्यात आले. त्यातच महापालिकेची मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्ण झाली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती होती.वीस वर्षांपासून काम प्रलंबितमहापालिकेने गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना राबविली. तेव्हापासून म्हणजेच १९९९ पासून वीस वर्षांत केवळ खडक हटवून एक चर खोदण्याचे काम महापालिका करू शकलेली नाही. आताही मुकणे धरणातून थेट जलवाहिनीचे काम सुरू असताना त्याठिकाणी अशाच प्रकारे चर खोदण्याचे काम मात्र सुरू आहे. अवघ्या वीस ते पंचवीस लाख रुपयांच्या कामाची जोखीम महापालिका पत्करत नाही. त्याचा फटका मात्र नागरिकांना बसणार आहे.४पावसाळा सुरू झाला असला तरी नाशिकवर पर्जन्यराजाची कृपा झालेली नाही. जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल, असे सांगितले जात असले तरी पाऊस होत नसल्याने चिंता वाढत चालली आहे.४परिणामी आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करायची की पाणीकपात करायची याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करीत असून याच आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई