शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

तीनशे एमसीएफटी जादा पाणी; तरीही जलसंकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 02:05 IST

शहराला एक नव्हे तर तब्बल तीन धरणांतून पाणीपुरवठा होत असतानाही केवळ महापालिकेचे चुकीचे नियोजन आणि जलसंपदा विभागाची अतिदक्षता यामुळे नाशिककरांवर जलसंकट घोंघावू लागले आहे. दारणा नदीतील पाणी दूषित असल्याने ते घेता येत नाही तर गौतमी गोदावरी तसेच कश्यपीतील पाणी धरणातील खडकामुळे गंगापूर धरणातील जलविहिरीपर्यंत पोहचू शकत नाही, अशी अवस्था असून त्यामुळे मुबलक पाणी असतानाही पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देलवकरच कपातीचा निर्णय : चुकीच्या नियोजनाचा फटका

नाशिक : शहराला एक नव्हे तर तब्बल तीन धरणांतून पाणीपुरवठा होत असतानाही केवळ महापालिकेचे चुकीचे नियोजन आणि जलसंपदा विभागाची अतिदक्षता यामुळे नाशिककरांवर जलसंकट घोंघावू लागले आहे. दारणा नदीतील पाणी दूषित असल्याने ते घेता येत नाही तर गौतमी गोदावरी तसेच कश्यपीतील पाणी धरणातील खडकामुळे गंगापूर धरणातील जलविहिरीपर्यंत पोहचू शकत नाही, अशी अवस्था असून त्यामुळे मुबलक पाणी असतानाही पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. या धरणालगत गंगापूर आणि गौतमी गोदावरी तसेच कश्यपी धरण बांधण्यात आले आहे. या दोन्ही छोट्या धरणांचे पाणी गंगापूर धरणातच येत असल्याने महापालिका निर्धास्त असते. यंदा तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूरऐवजी दारणा धरणातूनदेखील पाणी आरक्षण वाढवून देण्यात आले. त्यातच महापालिकेची मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्ण झाली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती होती.वीस वर्षांपासून काम प्रलंबितमहापालिकेने गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना राबविली. तेव्हापासून म्हणजेच १९९९ पासून वीस वर्षांत केवळ खडक हटवून एक चर खोदण्याचे काम महापालिका करू शकलेली नाही. आताही मुकणे धरणातून थेट जलवाहिनीचे काम सुरू असताना त्याठिकाणी अशाच प्रकारे चर खोदण्याचे काम मात्र सुरू आहे. अवघ्या वीस ते पंचवीस लाख रुपयांच्या कामाची जोखीम महापालिका पत्करत नाही. त्याचा फटका मात्र नागरिकांना बसणार आहे.४पावसाळा सुरू झाला असला तरी नाशिकवर पर्जन्यराजाची कृपा झालेली नाही. जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल, असे सांगितले जात असले तरी पाऊस होत नसल्याने चिंता वाढत चालली आहे.४परिणामी आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा करायची की पाणीकपात करायची याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करीत असून याच आठवड्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई