शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

तीन हेक्टर क्षेत्र बाधीत :चुंचाळेच्या राखीव वनात भडकला 'वणवा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 16:13 IST

वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यास यश आले.

ठळक मुद्देवन, अग्नीशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्नरोपवन सुरक्षित असल्याचा दावा

नाशिक : चुंचाळे येथील डोंगराभोवती असलेल्या राखीव वनात डोंगराच्या माथ्यावरुन अचानकपणे आग लागली. रात्री दहा वाजेच्या सुमारास डोंगरमाथ्यावर आगीच्या ज्वाला भडकल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी तत्काळ अग्नीशमन दलासह वनविभागाला माहिती कळविली. माहिती मिळताच सातपुर उपकेंद्रांसह एमआयडीसी केंद्राच्या जवानांनी तसेच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अडीच तास शर्थीेचे प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यास यश आले.नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारितित असलेल्या नाशिक वनपरिक्षेत्रातील चुंचाळे वन कक्ष क्रमांक २२७च्या राखीव वनात डोंगरमाथ्यावर अचानकपणे रात्रीच्या सुमारास कृत्रिम वणवा भडकला होता. या वणव्याची माहिती मिळताच त्वरित नाशिक पश्चिम वनविभागाचे कर्मचारी तसे अग्नीशमन दलाचे जवान आणि ग्रीन रिव्हॅल्युएशन संस्थेच्या काही स्वयंसेवकांनी धाव घेतली. डोंगर माथ्यावर आगीच्या ज्वाला भडकत असून वाळलेले गवत मोठ्या वेगाने जळत असल्याचे लक्षात आले. यावेळी रात्रीच्या किर्रर्र अंधारात वनसंपदा वाचविण्यासाठी जवानांसह वनकर्मचाऱ्यांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. बॅटरीच्या प्रकाशात डोंगर चढत आजुबाजुंच्या झाडांच्या काही फांद्या तोडत त्याची झोडपणी तयार करुन पारंपरिक पध्दतीने आग विझविण्यास सुरुवात केली. सुमारे पंधरा ते वीस लोकांनी झोडपणी करत पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली. डोंगरमाथ्यावर आग भडकलेली असल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांना पाण्याचा मारा करणेही अशक्य होते. यामुळे जवानांनी फावडे, टिकाव आदी साहित्याच्या मदतीने गवत काढण्यास सुरुवात केली. वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यास यश आले.रोपवन सुरक्षित असल्याचा दावायेथील टेकडीभोवती असलेल्या रोपवनात सुमारे दहा हजार रोपांची लागवड काही वर्षांपुर्वी करण्यात आली आहे. ग्रीन रिव्हॅल्युएशन या स्वयंसेवी संस्थेकडून रोपांची देखभाल केली जात आहे. रोपांची दमदार वाढ झाली असून या रोपवनाला आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता; मात्र वेळीच वनविभाग व मनपाच्या अग्नीशमन दलाच्या जवानांसह स्वयंसेवकांनी घेतलेल्या संयुक्त परिश्रमामुळे रोपवनाला आगीची झळ बसली नाही. रोपवन सुरक्षित असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. 

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलforest departmentवनविभागforestजंगल