शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तीन हेक्टर क्षेत्र बाधीत :चुंचाळेच्या राखीव वनात भडकला 'वणवा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 16:13 IST

वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यास यश आले.

ठळक मुद्देवन, अग्नीशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्नरोपवन सुरक्षित असल्याचा दावा

नाशिक : चुंचाळे येथील डोंगराभोवती असलेल्या राखीव वनात डोंगराच्या माथ्यावरुन अचानकपणे आग लागली. रात्री दहा वाजेच्या सुमारास डोंगरमाथ्यावर आगीच्या ज्वाला भडकल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी तत्काळ अग्नीशमन दलासह वनविभागाला माहिती कळविली. माहिती मिळताच सातपुर उपकेंद्रांसह एमआयडीसी केंद्राच्या जवानांनी तसेच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अडीच तास शर्थीेचे प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यास यश आले.नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारितित असलेल्या नाशिक वनपरिक्षेत्रातील चुंचाळे वन कक्ष क्रमांक २२७च्या राखीव वनात डोंगरमाथ्यावर अचानकपणे रात्रीच्या सुमारास कृत्रिम वणवा भडकला होता. या वणव्याची माहिती मिळताच त्वरित नाशिक पश्चिम वनविभागाचे कर्मचारी तसे अग्नीशमन दलाचे जवान आणि ग्रीन रिव्हॅल्युएशन संस्थेच्या काही स्वयंसेवकांनी धाव घेतली. डोंगर माथ्यावर आगीच्या ज्वाला भडकत असून वाळलेले गवत मोठ्या वेगाने जळत असल्याचे लक्षात आले. यावेळी रात्रीच्या किर्रर्र अंधारात वनसंपदा वाचविण्यासाठी जवानांसह वनकर्मचाऱ्यांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. बॅटरीच्या प्रकाशात डोंगर चढत आजुबाजुंच्या झाडांच्या काही फांद्या तोडत त्याची झोडपणी तयार करुन पारंपरिक पध्दतीने आग विझविण्यास सुरुवात केली. सुमारे पंधरा ते वीस लोकांनी झोडपणी करत पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली. डोंगरमाथ्यावर आग भडकलेली असल्याने अग्नीशमन दलाच्या जवानांना पाण्याचा मारा करणेही अशक्य होते. यामुळे जवानांनी फावडे, टिकाव आदी साहित्याच्या मदतीने गवत काढण्यास सुरुवात केली. वनकर्मचाऱ्यांनी चरप्रमाणे खोदकाम करत आग डोंगराच्या पायथ्याला असलेल्या रोपवनापर्यंत पोहचणार नाही, याची खबरदारी घेतली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर भडकलेली आग अखेर विझविण्यास यश आले.रोपवन सुरक्षित असल्याचा दावायेथील टेकडीभोवती असलेल्या रोपवनात सुमारे दहा हजार रोपांची लागवड काही वर्षांपुर्वी करण्यात आली आहे. ग्रीन रिव्हॅल्युएशन या स्वयंसेवी संस्थेकडून रोपांची देखभाल केली जात आहे. रोपांची दमदार वाढ झाली असून या रोपवनाला आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता; मात्र वेळीच वनविभाग व मनपाच्या अग्नीशमन दलाच्या जवानांसह स्वयंसेवकांनी घेतलेल्या संयुक्त परिश्रमामुळे रोपवनाला आगीची झळ बसली नाही. रोपवन सुरक्षित असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. 

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलforest departmentवनविभागforestजंगल