तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:31 AM2020-06-29T00:31:55+5:302020-06-29T00:35:32+5:30

प्रेमप्रकरणातून जेलरोड येथील सागर अहिरे याचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तीनही संशयितांना उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच पकडले. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Three arrested in youth murder case | तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

Next

नाशिकरोड : प्रेमप्रकरणातून जेलरोड येथील सागर अहिरे याचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील तीनही संशयितांना उपनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच पकडले. त्यांना नाशिकरोड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
जेलरोड धारबळे मळा, विठ्ठलनगर येथील सागर संदीप अहिरे (१९) याचा शनिवारी जेलरोड गोदावरी नदी पात्रालगत खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. खुनाची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मयत सागरची ओळख पटताच पोलिसांनी तपास सुरू केला असता अवघ्या दोन तासांत संशयित अजय दीपक जाधव (२०), राकेश नाना घुमरे (१९) आणि राहुल उर्फ रोमिओ राजेश राहटळ (२१ सर्व रा. जेलरोड शिवाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सागरचा खून केल्याची कबुली दिली.
या तिघांपैकी एकाच्या बहिणीला सागरने प्रेम व्यक्त केल्याची बाब तिच्या भावाला समजल्यानंतर तो संतापला होता. शनिवारी सायंकाळी संशयितांनी सागरला घेऊन जात गोदावरी नदीपात्राच्या कडेला त्याची हत्त्या केली.





झुडपात सर्वांनी मद्यपान केले. तेथे लपवलेला कोयता काढून सागरच्या मान, डोक्यावर वार करून पलायन केले. सागरचा जागीच मृत्यू झाला. सागरला या तिघांसोबत अन्य मित्रांनी पाहिले होते. केवळ तेवढ्या गोष्टीचा आधार घेत पोलिसांनी हल्लेखोरांना दोन तासांत अटक केली. रविवारी तिघा संशयितांना नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Three arrested in youth murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.