शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सरकारविरोधी हजारो लाल सैनिकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:46 IST

दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्टÑाचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विनाअट जाहीर करा, या प्रमुख मागण्या घेऊन पुन्हा एकदा वर्षभरानंतर नाशकातून मुंबईच्या दिशेने ‘लाल वादळ’ उठण्याच्या तयारीत आहे.

नाशिक : दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्टÑाचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विनाअट जाहीर करा, या प्रमुख मागण्या घेऊन पुन्हा एकदा वर्षभरानंतर नाशकातून मुंबईच्या दिशेने ‘लाल वादळ’ उठण्याच्या तयारीत आहे. यासाठी बुधवारी (दि.२०) दिवसभरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी नाशिक मुक्कामी आहेत.शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी दालनात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेचे राष्टÑीय अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या शिष्टमंडळाने तब्बल अडीच तास चर्चा केली. किसानसभेकडून महाजन यांना मागण्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत निवेदन देण्यात आले. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. जोपर्यंत शासनाकडून लेखीस्वरूपात ठोस आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत लॉँग मार्च रद्द केला जाणार नाही अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली. त्यामुळे गुरुवारी (दि.२०) सकाळी ९.३० वाजता नाशिकवरून मुंबईच्या दिशेने ‘लॉँग मार्च’ निघणार असल्याचे किसान सभेने स्पष्ट केले.वर्षभरापूर्वी नाशिकवरून मुंबईत हजारो ते लाखोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी कष्टकºयांनी पायी धडक देत फडणवीस सरकारकडे विविध मागण्यांचे गाºहाणे मांडले होते; मात्र वर्ष उलटूनदेखील त्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने पुन्हा एकदा महाराष्टतील शेतकरी, आदिवासी बांधव अखिल भारतीय किसान सभेने दिलेल्या ‘लॉँग मार्च’च्या हाकेला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरलेआहेत. आठवडाभरात हजारोंच्या संख्येने आंदोलक विधानसभेला घेराव करणार असल्याचे सांगण्यात आले. लॉँग मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, डॉ. अजित नवले, किसन गुजर आदि नेते करीत आहेत.किसानसभेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, त्यांच्या मागण्यांबाबत सरकार नक्की विचार करेल. शेतकºयांची कुठल्याही प्रकारे पायपीट होऊ देणार नाही. शिष्टमंडळाच्या मागणीनुसार सरकारकडून सकाळी लेखी स्वरूपात आश्वासनांची हमी दिली जाईल.- गिरीश महाजन, जलसंपदामंत्रीसरकारने शेतकºयांचा विश्वासघात करत गद्दारी केली. वर्ष उलटले तरी मागण्या मान्य केल्या नाही आणि याचा जाब विचारण्यासाठी किसान सभेने लॉँग मार्च जाहीर केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधिकाराचा गैरवापर करून पोलीस प्रशासनामार्फत दडपशाही केली. मोर्चासाठी नाशिकला येणारी लाल बावटा असलेली वाहने रोखून धरली. गुरुवारी हा लॉँग मार्च संपूर्ण ताकदीने मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे.- डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभाशेतकºयांनी वर्षभरापूर्वी केलेल्या पायपिटीकडे या असंवेदनशील सरकारने दुर्लक्ष करीत त्यांच्या तोंडाला पाने पुसली. हे सरकार विश्वासघातकी व केवळ आश्वासनांची खैरात करणारे आहे. यामुळे पुन्हा त्या मागण्यांचा जाब विचारण्यासाठी मुंबईत विधानसभेला शेतकरी घेराव घालणार आहे. किसान सभेने पुकारलेला हा एल्गार संपूर्ण राज्यातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर आदिवासींचा आवाज आहे, हे सरकारने विसरू नये. लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी धडक देणार आहे.- जिवा पांडू गावित, आमदारअशा आहेत मागण्या...च्शेतकºयांचे संपूर्ण कर्ज विनाअट माफ करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या.च्ठाणे-पालघर, नाशिक जिल्ह्णासह राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या शेतीला पाणी द्या.च्नार-पार, दमणगंगा, वाघ व पिंजाळ नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवा अन गिरणा-गोदावरी खोºयात वळवा.हाराष्टचे पाणी गुजरातला कुठल्याही अटीवर देता कामा नये.जरातला धरण अन् आदिवासीला मरण नको.२००६ वनाधिकार कायदा डाव्या पक्षांच्या दबावाखाली केंद्राने पारित केला. २००८ साली नियमावली.च्ठाणे, पालघर जिल्ह्यातील सूर्या, धामणी, कुर्झे, तानसा, वैतरणा, भातसा व अन्य धरणांचे पाणी अग्रक्रमाने या जिल्ह्यांमधील जनतेला पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे.च्शिधापत्रिकाधारकांना नव्या शिधापत्रिका द्या, पुरेसे मुबलक प्रमाणात गोरगरिबांना शिधापुरवठा करावा.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय