दरेगावच्या खव्याला दीडशे वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:00 IST2019-06-15T22:32:08+5:302019-06-16T01:00:20+5:30
प्रत्येक गावाला एक परंपरा, स्वत:ची वेगळी ओळख असते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने होणाऱ्या बदलात परंपरा विशेष ओळख टिकवून ठेवणे अवघड होऊन बसले आहे. मात्र सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव येथील ग्रामस्थांनी दीडशे वर्षांपूर्वीची खवा तयार करण्याची परंपरा आजही टिकवून ठेवली आहे.

दरेगावच्या खव्याला दीडशे वर्षांची परंपरा
प्रवीण दोशी। लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : प्रत्येक गावाला एक परंपरा, स्वत:ची वेगळी ओळख असते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने होणाऱ्या बदलात परंपरा विशेष ओळख टिकवून ठेवणे अवघड होऊन बसले आहे. मात्र सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव येथील ग्रामस्थांनी दीडशे वर्षांपूर्वीची खवा तयार करण्याची परंपरा आजही टिकवून ठेवली आहे.
गडावर येणाºया राज्यभरातील भाविकांकडून या खव्याला पसंती दिली जाते आहे. कोणतीही रासायनिक प्रक्रि या न करता स्वादिष्ट खवा बनविणाºया दरेगाववासीयांच्या खव्याने सर्वत्र प्रसिद्धी मिळविली आहे. दिंडोरी व कळवण तालुक्याच्या सीमेलगत असणारे दरेगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून खवा बनविण्याची परंपरा आहे. गावातील गवळी समाजाचा हा प्रमुख व्यवसाय आहे.
दरेगावच्या खव्याला कळवण सप्तशृंगीगडासह नाशिक जिल्ह्यात मागणी आहे. पेढे व विविध प्रकारच्या मिठाईमध्ये खव्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याने दुकानदारही येथील खव्याला पसंती देतात.
गाईच्या पाच लिटर दुधापासून तर म्हशीच्या चार लिटर दुधापासून एक किलो खवा तयार करण्यात येतो. दूध तापवून आटवून त्याचा खवा तयार केला जातो. पूर्वी दूध आटविण्यासाठी लाकडी भट्टीचा वापर केला जायचा. आता मात्र चुलीवर दूध आटवले जाते. अपवादात्मक स्थितीत आजही काही घटक पारंपरिक पद्धतीचा वापर
करत असल्याची माहिती देण्यात आली.
खव्याच्या प्रतवारीनुसार दोनशे रु पये किलोला दर मिळतो. वास्तविक दुधाच्या दराच्या तुलनेत हा दर खवा तयार करणाऱ्यांना परवडणारा नाही; मात्र पारंपरिक व्यवसाय टिकविण्यासाठी पर्यायी व्यवसाय म्हणून याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यामागे आहे.
जुलै ते डिसेंबरदरम्यान गाई व म्हशीसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्याने या काळात दूध उत्पादनात वाढ होत असल्याने खवा तयार करण्याचे सर्वाधिक प्रमाण या कालावधीत असते. तासन्तास भट्टीसमोर बसून दर्जेदार खवा तयार करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. कळवण तालुक्यातील दरेगाव, मोहनदरी, नांदुरी, कातळगाव या परिसरात खवा तयार करण्याचा व्यवसाय केला जातो.
दरेगावच्या खव्याच्या तुलनेत इतरांचे प्रमाण नगण्य आहे. सागाच्या व पळसाच्या पानांमध्ये किरकोळ विक्रे ते एक किलोपासून पाच किलोपर्यंत खवा ठेवण्यात येतो. अर्धा ते एक किलो आकारमानाचे खव्याचे गोळे असलेली ही पाने भांड्यात ठेवून गावोगावी त्याची विक्र ी केली जाते. किरकोळ विक्र ेत्याची पद्धत तर घाऊक विक्रे ते मोठ्या भांड्यांमधून खवा घेऊन त्याची इच्छित ठिकाणी वाहतूक करून विक्र ी करतात.