शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

१०४ टँकर्स भागवताहेत ३६८ गाव-वाड्यांची तहान

By sandeep.bhalerao | Updated: November 21, 2023 14:07 IST

बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये आठ शासकीय आणि ९६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक : यंदा जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने जलस्रोत पुरेसे भरले नसल्याने अनेक गावे आणि वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यातील १३१ गावे आणि २३७ वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

गतवर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे अनेक तालुके कोरडेच असल्याने त्याचा परिणाम जलस्रोत आणि पिकांवर झाल्यामुळे जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळी आणि आठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गंगापूर आणि दारणा धरणातून जायकवाडीला पाणी देण्याचाही प्रश्न असल्याने पाण्याचा विषय सध्या संवेदनशील बनला आहे.

पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यात नोव्हेंबरपासूनच टँकर सुरू करण्याची वेळ आली असून, सद्य:स्थितीत १०४ टँकर्सद्वारे १३१ गावे आणि २३७ वाड्यांची तहान भागविली जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ३७ गावे आणि १६२ वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत, तर येवला तालुक्यातील ४५ गावे आणि १५ वाड्या अशा एकूण ६० ठिकाणी टँकरने पाणी पोहचत आहे. बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये आठ शासकीय आणि ९६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक