शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

विधानसभा निवडणुकीनंतर  विरोधकच नसतील : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:27 IST

मतदारांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला. निवडणुकीत मोदींची त्सुनामीच दिसून आली. भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच हवा आहे.

नाशिक : मतदारांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला. निवडणुकीत मोदींची त्सुनामीच दिसून आली. भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच हवा आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील नेते भाजपात प्रवेश करीत असून, विरोधी पक्षनेतेदेखील भाजपत आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात विरोधकच शिल्लक राहणार नसल्याची टिका पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नाशिकमध्ये पार पडली. त्याच्या समारोप सोहळ्यात महाजन बोलत होते. व्यासपीठावर महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक, खासदार भारती पवार, महिला मोर्चा राष्ट्रीय चिटणीस पूजा मिश्रा, आमदार देवयानी फरांदे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष कांता नलावडे, महापौर रंजना भानसी, नीता केळकर, उमा खापरे, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोहिणी नायडू उपस्थित होते. महाजन यांनी यावेळी बोलताना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ५० जागांही जिंकता येणार नसल्याचे भाकित केले. आतापर्यंतच्या निवडणुकीत माझा शब्द कधीच खोटा ठरला नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकसभेच्या निवडणुकीत तीनशेहून अधिक जागा निवडूण येतील असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र मोदी सरकारच्या कामगिरीवर मतदारांनी विश्वास दाखविल्याने भाजपाला पुन्हा एकदा विजय प्राप्त करता आला आहे. त्याचप्रमाणे राज्यात मुख्यमंत्र्यांचे काम असून, गेल्या ५०-६० वर्षांपासून रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्नही त्यांनी कायदेशीर चौकटीत बसवून मार्गी लावला आहे. अशा परिस्थितीत एकीकडे काँग्रेसी नेत्याचे तिघांचे तोंड तीन दिशेला आहे, तर दुसरीकडे विरोधी बाकावर पहिल्या फळीत बसणारे नेते भाजपात प्रवेश करण्यासाठी काहीत तरी करा, असे सांगत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विरोधक ५० जागाही जिंकू शकणार नाहीत . मात्र या निवडणुकीत विजयासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवाहन गिरीश महाजन यांनी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना केले.ही तर फिक्ंिसग : चव्हाणविधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसभेपेक्षा विधानसभेचे चित्र वेगळे असेल असे सांगून राज्यात आघाडीला चांगले यश मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस