शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

फाळके यांच्या जन्मभूमीत साधा त्यांचा पुतळाही नाही ; फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मुनीराम अग्रवाल यांनी व्यक्त केली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:54 IST

नाशिक : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची नाशिकही जन्मभूमी! गेल्या ३० एप्रिलपासून त्यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाला प्रारंभ झाला. मात्र, शासनाला आणि फिल्म सिटीला याचा कितपत गंध आहे, याविषयी शंका आहे. फाळके यांच्या जन्मभूमीत त्यांचे नावाचे एक स्मारक असले तरी त्याची दुरवस्था झाली आहे, शिवाय त्यांचा साधा पुतळाही शहरात नाही अशी खंत फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मुनीराम अग्रवाल यांनी व्यक्त केली. या वर्षात किमान नव्या पिढीतील कलावंतांना फाळके कळावेत याठिकाणी फाळके यांच्या चित्रपटांचे महोत्सव किमान मेट्रो सिटीत भरावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदीडशेवी जयंतीशासनाने दखल घेण्याची गरज

नाशिक : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची नाशिकही जन्मभूमी! गेल्या ३० एप्रिलपासून त्यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाला प्रारंभ झाला. मात्र, शासनाला आणि फिल्म सिटीला याचा कितपत गंध आहे, याविषयी शंका आहे. फाळके यांच्या जन्मभूमीत त्यांचे नावाचे एक स्मारक असले तरी त्याची दुरवस्था झाली आहे, शिवाय त्यांचा साधा पुतळाही शहरात नाही अशी खंत फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मुनीराम अग्रवाल यांनी व्यक्त केली. या वर्षात किमान नव्या पिढीतील कलावंतांना फाळके कळावेत याठिकाणी फाळके यांच्या चित्रपटांचे महोत्सव किमान मेट्रो सिटीत भरावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रश्न : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची दीडशेवी जयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे त्याबद्दल काय वाटते?अग्रवाल : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके हे या चित्रपटसृृष्टीचे जनक आहेत. त्यांंनी अत्यंत प्रतिकूल काळात चित्रपट तयार केलेत. आजचे चित्रपटसृष्टीचे स्वरूप त्यांच्यामुळेच उभे राहिले आहेत. त्यामुळे या वर्षात नव्या पिढीला फाळके कळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नाशिकमध्ये १९७९ मध्ये फाळके फिल्म सोसायटी स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक उपक्रम राबविले. फाळके यांचे उचित स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न केले. नाशिक महापालिकेने एक स्मारक उभे केले असले तरी त्यात साधा पुतळाही नाही. तेथे नव्हे तर नाशिक शहरातदेखील एकही पुतळा नाही, त्यामुळे त्याची कुठे तरी दखल घेतली पाहिजे.

प्रश्न : फाळके यांच्या विषयीची माहिती कलावंतांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय केले पाहिजे असे वाटते?अग्रवाल : फाळके यांच्याविषयी जुन्या कलाकारांना आदर आहे. स्मारक उभारण्याच्या निमित्ताने आम्ही धर्मेंद्र यांच्यापासून विनोद खन्ना, आशा पारेख अशा सर्वांना वेळोवेळी भेटलो. त्यांनी मदत देण्याची तयारी दर्शविली. मात्र त्यादृष्टीने शासन आणि प्रशासनाने तयारी करणे आवश्यक आहे. देशभरात फाळके यांच्या चित्रपटांचे महोत्सव भरवले पाहिजे. तसेच प्रत्येक चित्रपटगृहात फाळके यांची प्रतिमा किंवा पुतळा उभारलाच पाहिजे. याशिवाय चित्रपट सुरू करताना प्रमाणपत्र प्रथम दाखविले जाते. त्याचवेळी फाळके यांचे छायाचित्र दाखवून त्याखाली चित्रपटसृष्टीचे जनक असल्याचे नमूद केले पाहिजे.

प्रश्न : फाळके यांच्या प्रचार प्रसारासाठी आपल्या सोसायटीने काय कार्य केले आहे?अग्रवाल : १९७९ मध्ये स्वातंत्र्यसैनिक तथा ज्येष्ठ पत्रकार द. शं. पोतनीस, मधुकर झेंडे, विजय जानोरकर, वसंतराव चुंबळे अशा आम्ही अनेकांनी ही संस्था स्थापन केली. नाशिकच्या प्रत्येक चित्रपटगृहात मान्यवरांच्या हस्ते फाळके यांची प्रतिमा भेट देऊन ती लावण्यास सांगितले. जगभरातील क्लासिक चित्रपट आधी शासकीय कन्या विद्यालय आणि त्यानंतर सर्कल चित्रपटगृहात दाखविले आहेत. फाळके स्मारकासाठी माजी पंतप्रधान (स्व.) राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, बलराम जाखड, शरद पवार यांच्याकडे नाशिकचे माजी खासदार (कै.) वसंत पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी या कामी मदत केली. स्मारकात फाळके यांचा जीवनपट चित्ररूपाने मांडण्यात आला, असे अनेक उपक्रम राबविले आहेत.

मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाbollywoodबॉलिवूड