शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

फाळके यांच्या जन्मभूमीत साधा त्यांचा पुतळाही नाही ; फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मुनीराम अग्रवाल यांनी व्यक्त केली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:54 IST

नाशिक : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची नाशिकही जन्मभूमी! गेल्या ३० एप्रिलपासून त्यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाला प्रारंभ झाला. मात्र, शासनाला आणि फिल्म सिटीला याचा कितपत गंध आहे, याविषयी शंका आहे. फाळके यांच्या जन्मभूमीत त्यांचे नावाचे एक स्मारक असले तरी त्याची दुरवस्था झाली आहे, शिवाय त्यांचा साधा पुतळाही शहरात नाही अशी खंत फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मुनीराम अग्रवाल यांनी व्यक्त केली. या वर्षात किमान नव्या पिढीतील कलावंतांना फाळके कळावेत याठिकाणी फाळके यांच्या चित्रपटांचे महोत्सव किमान मेट्रो सिटीत भरावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदीडशेवी जयंतीशासनाने दखल घेण्याची गरज

नाशिक : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची नाशिकही जन्मभूमी! गेल्या ३० एप्रिलपासून त्यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाला प्रारंभ झाला. मात्र, शासनाला आणि फिल्म सिटीला याचा कितपत गंध आहे, याविषयी शंका आहे. फाळके यांच्या जन्मभूमीत त्यांचे नावाचे एक स्मारक असले तरी त्याची दुरवस्था झाली आहे, शिवाय त्यांचा साधा पुतळाही शहरात नाही अशी खंत फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मुनीराम अग्रवाल यांनी व्यक्त केली. या वर्षात किमान नव्या पिढीतील कलावंतांना फाळके कळावेत याठिकाणी फाळके यांच्या चित्रपटांचे महोत्सव किमान मेट्रो सिटीत भरावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रश्न : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची दीडशेवी जयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे त्याबद्दल काय वाटते?अग्रवाल : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके हे या चित्रपटसृृष्टीचे जनक आहेत. त्यांंनी अत्यंत प्रतिकूल काळात चित्रपट तयार केलेत. आजचे चित्रपटसृष्टीचे स्वरूप त्यांच्यामुळेच उभे राहिले आहेत. त्यामुळे या वर्षात नव्या पिढीला फाळके कळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नाशिकमध्ये १९७९ मध्ये फाळके फिल्म सोसायटी स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक उपक्रम राबविले. फाळके यांचे उचित स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न केले. नाशिक महापालिकेने एक स्मारक उभे केले असले तरी त्यात साधा पुतळाही नाही. तेथे नव्हे तर नाशिक शहरातदेखील एकही पुतळा नाही, त्यामुळे त्याची कुठे तरी दखल घेतली पाहिजे.

प्रश्न : फाळके यांच्या विषयीची माहिती कलावंतांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय केले पाहिजे असे वाटते?अग्रवाल : फाळके यांच्याविषयी जुन्या कलाकारांना आदर आहे. स्मारक उभारण्याच्या निमित्ताने आम्ही धर्मेंद्र यांच्यापासून विनोद खन्ना, आशा पारेख अशा सर्वांना वेळोवेळी भेटलो. त्यांनी मदत देण्याची तयारी दर्शविली. मात्र त्यादृष्टीने शासन आणि प्रशासनाने तयारी करणे आवश्यक आहे. देशभरात फाळके यांच्या चित्रपटांचे महोत्सव भरवले पाहिजे. तसेच प्रत्येक चित्रपटगृहात फाळके यांची प्रतिमा किंवा पुतळा उभारलाच पाहिजे. याशिवाय चित्रपट सुरू करताना प्रमाणपत्र प्रथम दाखविले जाते. त्याचवेळी फाळके यांचे छायाचित्र दाखवून त्याखाली चित्रपटसृष्टीचे जनक असल्याचे नमूद केले पाहिजे.

प्रश्न : फाळके यांच्या प्रचार प्रसारासाठी आपल्या सोसायटीने काय कार्य केले आहे?अग्रवाल : १९७९ मध्ये स्वातंत्र्यसैनिक तथा ज्येष्ठ पत्रकार द. शं. पोतनीस, मधुकर झेंडे, विजय जानोरकर, वसंतराव चुंबळे अशा आम्ही अनेकांनी ही संस्था स्थापन केली. नाशिकच्या प्रत्येक चित्रपटगृहात मान्यवरांच्या हस्ते फाळके यांची प्रतिमा भेट देऊन ती लावण्यास सांगितले. जगभरातील क्लासिक चित्रपट आधी शासकीय कन्या विद्यालय आणि त्यानंतर सर्कल चित्रपटगृहात दाखविले आहेत. फाळके स्मारकासाठी माजी पंतप्रधान (स्व.) राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, बलराम जाखड, शरद पवार यांच्याकडे नाशिकचे माजी खासदार (कै.) वसंत पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी या कामी मदत केली. स्मारकात फाळके यांचा जीवनपट चित्ररूपाने मांडण्यात आला, असे अनेक उपक्रम राबविले आहेत.

मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाbollywoodबॉलिवूड