शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

...तर नाशिककरांवर जलसंकट कधीही येऊ शकते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 15:59 IST

महापालिकेने 2041 मध्ये भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले ही खुप मोठी घटना आहे आता 2041 पर्यंत पाण्याची चिंता नाही असं दिसतं असलं तरी वास्तवात हे शक्य आहे का याचा विचार करायला हवा.

ठळक मुद्देधरणातील पाण्याचा बेसुमार वापरमराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा दबावजलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे नवे नियमनिसर्गाच्या बदलत्या चक्राने कमी होणारे पाणी

संजय पाठक, नाशिक - गंगापूर धरणात साठा कमी झाला आणि पावसाने ओढ दिल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले त्यामुळे नाशिक महापालिकेच्या महासभेत जोरदार चर्चा झाली. धरण उशाशी आणि कोरड घशाशी असं झालंच कसं असा प्रश्नही विचारण्यात आला खरा, परंतु पाच धरणातून पाणी पुरवठा होतो म्हणजे जल संकट उद्भवेल असं काही नाही बदलत्या परिस्थितीत हे संकट आता केव्हाही येऊ शकते.नाशिक शहराला पूर्वी फक्त गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी पुरवठा होत होता त्यानंतर गंगापूर धरणाला कश्यपी आणि गौतमी गोदावरी अशी दोन स्टोअर छोटी धरणे झाली त्यानंतर आता तर मुकणे धरणातून पाणी आरक्षण मिळाले आणि तेथूनही पाणी मिळाले पाच धरणातून पाणी पुरवठा होतोय आणि महापालिकेने 2041 मध्ये भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले ही खुप मोठी घटना आहे आता 2041 पर्यंत पाण्याची चिंता नाही असं दिसतं असलं तरी वास्तवात हे शक्य आहे का याचा विचार करायला हवा.पाणी आरक्षण आहे आणि ते घरापर्यंत पोहोचणार अशी योजना असून चालणार नाही पाण्याचा अमर्याद वापर ही सर्वाधिक गंभीर बाब आहे. नाशिक महापालिका सरासरी 460 दश लक्ष लिटर्स पाण्याचा रोज उपसा करते मात्र त्यानंतरही शहरात केवळ वापरासाठी बोअर खोदण्याचे प्रमाण मोठे आहे हे प्रमाण इतके वाढले की आता झपाट्याने भूजल पातळी कमी होणाऱ्या शहरात नाशिकचा क्रमांक अगदी वरचा लागला आणि शहराला रेड अलर्ट मिळाला. म्हणजे दैनंदिन महापालिकेचा धरणातून होणारा पाणी उपसा त्याशिवाय भूगर्भातील पाणी इतके भयंकर पाणी सध्या शहरात वापरले आहे.सध्या भूजल पातळी खालविल्याने जमिनीतून भविष्यात किती पाणी मिळेल हे सांगता येत नाही पण धरणातील आरक्षण असूनही पाणी किती वर्ष पुरेल हे सांगता येत नाही त्याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा होणारा वापर !नाशिक महापालिकेने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 20 वर्षातील संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना आणि त्यानंतर भुयारी गटार योजना राबविली पण 10 वर्षातच या योजना कमी पडू लागल्या. याचे कारण म्हणजे शहरीकरण 6.4 टक्के या वेगाने वाढत गेले. आताही नेहरू नागरी अभियानात 60 कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा सक्षम करण्यावर खर्च करण्यात आले पण आज केवळ शहरात जलवाहिन्याचे जाळे विस्तारित भागात नेण्यासाठी महापालिकेने 300 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून तो अमृत योजनेत सादर केला आहे. म्हणजे पुन्हा वाढत्या लोकसंखेमुळे अगोदरची योजना कमी पडली आहे.हे चक्र असच सुरू राहीले तर वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे कमी पडणारे पाणी असच सुरू राहणार आहे यात अहमदनगर आणि मराठवाड्याला सोडले जाणारे पाणी गृहीत धरलेले नाही तेथील टंचाई आणि गरज म्हणून नाशिकच्या गंगापूर, दारणा मुकणे अशा प्रकारच्या धरणातून पाणी सोडावे लागेलच. समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली हा नाशिककरांवर अन्याय आहे असे म्हंटले जाईल पण कायद्यानुसार मेंढीगिरी समितीचा आढावा घेऊन मराठवाड्याला पाणी कमी करण्याचे धाडस सरकारातील राजकारणी दाखविणार नाही. या शिवाय निसर्गाचा लहरीपणा आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे दरडोई 135 लिटर्स पाणी देण्याचे निकष नाशिककरांच्या मुळावर आहेच या सर्व बाबींचा विचार करता नाशिककरांनी जल संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे उचित आहे

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका