शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

...तर नाशिककरांवर जलसंकट कधीही येऊ शकते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 15:59 IST

महापालिकेने 2041 मध्ये भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले ही खुप मोठी घटना आहे आता 2041 पर्यंत पाण्याची चिंता नाही असं दिसतं असलं तरी वास्तवात हे शक्य आहे का याचा विचार करायला हवा.

ठळक मुद्देधरणातील पाण्याचा बेसुमार वापरमराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा दबावजलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे नवे नियमनिसर्गाच्या बदलत्या चक्राने कमी होणारे पाणी

संजय पाठक, नाशिक - गंगापूर धरणात साठा कमी झाला आणि पावसाने ओढ दिल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले त्यामुळे नाशिक महापालिकेच्या महासभेत जोरदार चर्चा झाली. धरण उशाशी आणि कोरड घशाशी असं झालंच कसं असा प्रश्नही विचारण्यात आला खरा, परंतु पाच धरणातून पाणी पुरवठा होतो म्हणजे जल संकट उद्भवेल असं काही नाही बदलत्या परिस्थितीत हे संकट आता केव्हाही येऊ शकते.नाशिक शहराला पूर्वी फक्त गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी पुरवठा होत होता त्यानंतर गंगापूर धरणाला कश्यपी आणि गौतमी गोदावरी अशी दोन स्टोअर छोटी धरणे झाली त्यानंतर आता तर मुकणे धरणातून पाणी आरक्षण मिळाले आणि तेथूनही पाणी मिळाले पाच धरणातून पाणी पुरवठा होतोय आणि महापालिकेने 2041 मध्ये भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले ही खुप मोठी घटना आहे आता 2041 पर्यंत पाण्याची चिंता नाही असं दिसतं असलं तरी वास्तवात हे शक्य आहे का याचा विचार करायला हवा.पाणी आरक्षण आहे आणि ते घरापर्यंत पोहोचणार अशी योजना असून चालणार नाही पाण्याचा अमर्याद वापर ही सर्वाधिक गंभीर बाब आहे. नाशिक महापालिका सरासरी 460 दश लक्ष लिटर्स पाण्याचा रोज उपसा करते मात्र त्यानंतरही शहरात केवळ वापरासाठी बोअर खोदण्याचे प्रमाण मोठे आहे हे प्रमाण इतके वाढले की आता झपाट्याने भूजल पातळी कमी होणाऱ्या शहरात नाशिकचा क्रमांक अगदी वरचा लागला आणि शहराला रेड अलर्ट मिळाला. म्हणजे दैनंदिन महापालिकेचा धरणातून होणारा पाणी उपसा त्याशिवाय भूगर्भातील पाणी इतके भयंकर पाणी सध्या शहरात वापरले आहे.सध्या भूजल पातळी खालविल्याने जमिनीतून भविष्यात किती पाणी मिळेल हे सांगता येत नाही पण धरणातील आरक्षण असूनही पाणी किती वर्ष पुरेल हे सांगता येत नाही त्याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा होणारा वापर !नाशिक महापालिकेने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 20 वर्षातील संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना आणि त्यानंतर भुयारी गटार योजना राबविली पण 10 वर्षातच या योजना कमी पडू लागल्या. याचे कारण म्हणजे शहरीकरण 6.4 टक्के या वेगाने वाढत गेले. आताही नेहरू नागरी अभियानात 60 कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा सक्षम करण्यावर खर्च करण्यात आले पण आज केवळ शहरात जलवाहिन्याचे जाळे विस्तारित भागात नेण्यासाठी महापालिकेने 300 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून तो अमृत योजनेत सादर केला आहे. म्हणजे पुन्हा वाढत्या लोकसंखेमुळे अगोदरची योजना कमी पडली आहे.हे चक्र असच सुरू राहीले तर वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे कमी पडणारे पाणी असच सुरू राहणार आहे यात अहमदनगर आणि मराठवाड्याला सोडले जाणारे पाणी गृहीत धरलेले नाही तेथील टंचाई आणि गरज म्हणून नाशिकच्या गंगापूर, दारणा मुकणे अशा प्रकारच्या धरणातून पाणी सोडावे लागेलच. समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली हा नाशिककरांवर अन्याय आहे असे म्हंटले जाईल पण कायद्यानुसार मेंढीगिरी समितीचा आढावा घेऊन मराठवाड्याला पाणी कमी करण्याचे धाडस सरकारातील राजकारणी दाखविणार नाही. या शिवाय निसर्गाचा लहरीपणा आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे दरडोई 135 लिटर्स पाणी देण्याचे निकष नाशिककरांच्या मुळावर आहेच या सर्व बाबींचा विचार करता नाशिककरांनी जल संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवणे उचित आहे

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका