शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

...तर पळता भुई थोडी होईल : संजय राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:30 IST

ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई थोडी होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी भाजपला दिली. 

नाशिक : ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई थोडी होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी भाजपला दिली. गिरीश महाजन यांच्यावर सुडाने कारवाई होऊ नये, या मताचे आपण आहोत, परंतु प्रताप सरनाईक, मी आम्हाला तर दहा ते पंधरा वर्षांचे जुने प्रकरण उकरून नोटीस पाठविली जात आ,हे हे त्यांनी विसरू नये. मात्र, राजकारणात दोन घ्यावे लागते दोन द्याव्याही लागतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना राऊत यांनी, भारतीय जनता पक्षाकडून संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा पुढे करण्यात येत असला, तरी औरंगाबादच्या विमानतळाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, असा कॅबिनेटचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी होत नाही. भाजपने अगोदर आपल्याच केंद्र सरकारकडे त्यासाठी आग्रह धरावा, अशी मागणी करून बिहार राज्यात औरंगाबाद जिल्हा आहे. त्याचेही नामकरण करण्यात यावे, अशी स्थानिक हिंदू धर्मीयांची मागणी आहे. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नामकरणाला ठाम विरोध दर्शविला आहे. बिहारमध्ये भाजपचे सरकार आहे, त्यामुळे बिहार व महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांनी या नामकरणासाठी आग्रह धरावा, असा टोलाही त्यांनी लगावला.  

टॅग्स :NashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा