शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

...तर पळता भुई थोडी होईल : संजय राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:30 IST

ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई थोडी होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी भाजपला दिली. 

नाशिक : ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई थोडी होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी भाजपला दिली. गिरीश महाजन यांच्यावर सुडाने कारवाई होऊ नये, या मताचे आपण आहोत, परंतु प्रताप सरनाईक, मी आम्हाला तर दहा ते पंधरा वर्षांचे जुने प्रकरण उकरून नोटीस पाठविली जात आ,हे हे त्यांनी विसरू नये. मात्र, राजकारणात दोन घ्यावे लागते दोन द्याव्याही लागतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना राऊत यांनी, भारतीय जनता पक्षाकडून संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा पुढे करण्यात येत असला, तरी औरंगाबादच्या विमानतळाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, असा कॅबिनेटचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी होत नाही. भाजपने अगोदर आपल्याच केंद्र सरकारकडे त्यासाठी आग्रह धरावा, अशी मागणी करून बिहार राज्यात औरंगाबाद जिल्हा आहे. त्याचेही नामकरण करण्यात यावे, अशी स्थानिक हिंदू धर्मीयांची मागणी आहे. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नामकरणाला ठाम विरोध दर्शविला आहे. बिहारमध्ये भाजपचे सरकार आहे, त्यामुळे बिहार व महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांनी या नामकरणासाठी आग्रह धरावा, असा टोलाही त्यांनी लगावला.  

टॅग्स :NashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा