शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

...तर पळता भुई थोडी होईल : संजय राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:30 IST

ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई थोडी होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी भाजपला दिली. 

नाशिक : ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद असून, कितीही नोटिसा येऊ द्या, आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, महाराष्ट्रातही आमचे सरकार आहे हे विसरू नये, असा इशारा देऊन आम्ही तलवार उपसली, तर पळता भुई थोडी होईल, हे ध्यानात घ्यावे, अशी अप्रत्यक्ष धमकी शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी भाजपला दिली. गिरीश महाजन यांच्यावर सुडाने कारवाई होऊ नये, या मताचे आपण आहोत, परंतु प्रताप सरनाईक, मी आम्हाला तर दहा ते पंधरा वर्षांचे जुने प्रकरण उकरून नोटीस पाठविली जात आ,हे हे त्यांनी विसरू नये. मात्र, राजकारणात दोन घ्यावे लागते दोन द्याव्याही लागतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना राऊत यांनी, भारतीय जनता पक्षाकडून संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा पुढे करण्यात येत असला, तरी औरंगाबादच्या विमानतळाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, असा कॅबिनेटचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी होत नाही. भाजपने अगोदर आपल्याच केंद्र सरकारकडे त्यासाठी आग्रह धरावा, अशी मागणी करून बिहार राज्यात औरंगाबाद जिल्हा आहे. त्याचेही नामकरण करण्यात यावे, अशी स्थानिक हिंदू धर्मीयांची मागणी आहे. मात्र, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नामकरणाला ठाम विरोध दर्शविला आहे. बिहारमध्ये भाजपचे सरकार आहे, त्यामुळे बिहार व महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांनी या नामकरणासाठी आग्रह धरावा, असा टोलाही त्यांनी लगावला.  

टॅग्स :NashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा