शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

 "...मग मला मुख्यमंत्री करा", नरहरी झिरवाळ यांचं मिश्किल विधान

By संदीप भालेराव | Updated: May 8, 2023 18:48 IST

राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो.

नाशिक : राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो. पण, लोक आताच प्रश्न विचारू लागले आहेत पुढे काय होणार? सरकार पडले तर? अशा जर तरच्या प्रश्नांवर मी काय बोलणार, मी तर म्हणेन मला मुख्यमंत्री करा, असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केले. मागे एका कार्यक्रमात अजित पवार यांनी ’आपणाला मुख्यमंत्री होणे आताही आवडेल,’ असे माध्यमांना सांगितले तेव्हा माध्यमांनी त्यावरच फोकस केल्याची आठवण करून देताना आता माझ्या विधानाबाबत असे करू नका, असा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला.

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर माध्यमांनी सोमवारी (दि. ८) नाशिकमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विचारले असता त्यांनी न्यायालयाचा निकाल सर्वोच्च असल्याचे म्हटले. आमदार अपात्रतेबाबत आपण घटनेनुसारच पत्र दिले असून, आमदार अपात्र ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण आपल्याकडे आल्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू, असेही ते म्हणाले.

आमदार अपात्रतेबाबत न्यायालयच निर्णय घेणार असल्याने आता निर्माण होणारे हे सर्व जर - तरचे प्रश्न आहेत. मात्र, अपात्रतेसंदर्भात आपण दिलेल्या पत्राला अधिक महत्व असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. घटनेच्या नियमानुसार अनुसरूनच आपण निर्णय दिलेला असून, निर्णय विरोधात गेला तर घटनेला चुकीचे म्हणणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दादा भाजपात जाणार नव्हतेच. शरद पवार यांच्या राजीनाम्यापूर्वी एक महिना अगोदरच अजित पवार भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. परंतु, दादा कधीही भाजपात जाणार नव्हते. आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ तर दादा जातील ना, असेही झिरवाळ म्हणाले. राजीनामा प्रकरणावर भाजपाबरोबर जाऊ पाहणाऱ्या आमदारांचीच समिती नियुक्त करण्यात आल्याच्या वृत्ताचाही त्यांनी समाचार घेतला. अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नसल्याने कुणी बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता, असे झिरवाळ म्हणाले.

 

टॅग्स :NashikनाशिकNarhari Jhariwalनरहरी झिरवाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार