शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करणे बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:18 IST

वन्यप्राण्याकडून वारंवार नव्हे तर एकदाच मनुष्यावर हल्ला झाल्यास त्या वन्यजीवाला ‘नरभक्षक’ असे म्हणणे चुकीचे आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नव्या मार्गदर्शक तत्वात स्पष्टपणे म्हटले आहे.

ठळक मुद्देवन्यजीव रेस्क्यू करण्याची आदर्श नियमावलीची (एसओपी) माहितीवनविभागाने दोन दिवसीय प्रशिक्षणपर कार्यशाळा आयोजित केली विशेष बचाव पथकाचा चमू घटनास्थळी पोहचून मदत देऊ शकेल

नाशिक : अनुसुची-१मधील एखाद्या वन्यजीवापासून मानवी जीवीतास धोका नसेल तसेच तो वन्यजीव अपंग झाला तर त्या वन्यजीवाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणे वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग ठरतो. कायद्यान्वये वन्यजीव रेस्क्यूची परवानगी केवळ वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षकच देऊ शकतात, असे प्रतिपादन युथ फॉरे नेचर कॉन्झर्वेशन आॅर्गनायझेशनचे वन्यजीव अभ्यासक डॉ. स्वप्नील सोनोने यांनी केले.अनुसुची-१मधील संरक्षित वन्यप्राणी बिबट्याची संख्या नाशिक शहरासह जिल्ह्यात वाढत आहे. बिबट्याकडून पाळीव पशुधनाला नुकसान पोहचविण्याच्या घटना वारंवार वनविभागाच्या पुर्व-पश्चिम भागामधील विविध गावपातळीवर घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी तसेच कुठल्याहीप्रकारची अपात्कालीन स्थिती उद्भवल्यास तत्काळ विशेष बचाव पथकाचा चमू घटनास्थळी पोहचून मदत देऊ शके ल, या उद्देशाने बचाव पथकाला सज्ज केले जात आहे.बचावपथकाला वन्यजीव रेस्क्यू करण्याची आदर्श नियमावलीची (एसओपी) माहिती तसेच रेस्क्यूचे प्रात्याक्षिकाद्वारे सरावासाठी वनविभागाने दोन दिवसीय प्रशिक्षणपर कार्यशाळा आयोजित केली आहे. शनिवारी (दि.१६) उंटवाडी येथील वनविश्रामगृहाच्या सभागृहात कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला. उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, सुजीत नेवसे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्यासह दोन्ही विभागाचे मिळून ३५ वनरक्षक यावेळ उपस्थित होते. यावेळी सोनोने यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियमाचे विविध कलम, पोटकलमांची विस्तृतपणे सोदाहरण माहिती दिली. यावेळी सोनोने म्हणाले, भारतीय वन्यजीव कायद्यातील कलम-११नुसार वन्यजीवांना रेस्क्यू करता येऊ शकते; मात्र त्यासाठी काही नियमावली कायद्याने आखून दिली आहे, त्याचे काटेकोरपणे पालन बंधनकारक आहे, असे सोनोने यावेळी म्हणाले. वन्यप्राण्याकडून वारंवार नव्हे तर एकदाच मनुष्यावर हल्ला झाल्यास त्या वन्यजीवाला ‘नरभक्षक’ असे म्हणणे चुकीचे आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नव्या मार्गदर्शक तत्वात स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव