शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

संविधानात ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द आणीबाणीत घुसडला : पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 01:31 IST

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ संविधानात नव्हता. हा शब्द अंतर्भूत करण्यात आला तो १९७६ म्हणजेच आणीबाणीदरम्यानच्या काळात. या घटनादुरुस्तीच्या काळात देशात आणीबाणी असल्याने विरोधातील अनेक पक्षांचे खासदार तुरुंगात असताना पाशवी सत्तेच्या आधारे ही घटनादुरुस्ती करण्यात आल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देमूळ संविधानात नसलेला हा शब्द तत्कालीन पाशवी सत्तेच्या आधारे अंतर्भूत केल्याचा आरोप

नाशिक : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ संविधानात नव्हता. हा शब्द अंतर्भूत करण्यात आला तो १९७६ म्हणजेच आणीबाणीदरम्यानच्या काळात. या घटनादुरुस्तीच्या काळात देशात आणीबाणी असल्याने विरोधातील अनेक पक्षांचे खासदार तुरुंगात असताना पाशवी सत्तेच्या आधारे ही घटनादुरुस्ती करण्यात आल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिकमध्ये सोमवारी आयोजित व्याख्यानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना कुलश्रेष्ठ यांनी संविधान हे देशात सर्वतोपरी असूनही त्यात देशाला अंधारात ठेवून अनेकदा बदल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मूळ संविधानात धारा ४४ अर्थात समान नागरी कायदाचा अंतर्भाव असतानाही तो लागू का झाला नाही. आपल्या देशात आजही बहुसंख्याक जनतेला समान नागरी कायदा अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोडची मागणी करावी लागण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याप्रमाणेच १९९३ यावर्षी कुणालाही न विचारता अचानकपणे नॅशनल मायनॉरिटी कमिशन तयार करण्यात आले. अवघ्या एक टक्क्याच्या आसपास असलेल्या पारसी, बौद्ध, शीख, तर तीन टक्के असलेल्या ख्रिश्चन समुदायाबरोबर तब्बल १६ टक्क्यांहून अधिक असलेल्या मुस्लीम समाजाचाही त्यात अंतर्भाव करण्यात आला आहे, हे वास्तव आहे. शबरीमला प्रवेश प्रकरणात संबंधित जनमानसाविरोधात निकाल देऊनही त्या न्यायाधीशांना सुरक्षेची गरज भासली नाही. मात्र, नुकताच कर्नाटकात हिजाबसंदर्भात संबंधित समूहाच्या विरोधात निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा घ्यावी लागली. म्हणजे निकाल आमच्या बाजूने असेल, तरच आम्ही ऐकू, अशी मानसिकता असल्यास देशात अराजकाची परिस्थिती निर्माण होईल, असा ईशारादेखील कुलश्रेष्ठ यांनी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत गजरा फाउंडेशनचे अध्यक्ष मदन पारख उपस्थित होते.

इन्फो

याचिका दाखल

सामान्य भारतीय नागरिकांपैकी केवळ हिंदूंनी मंदिरात दान केलेला पैसाच सरकारजमा होत असून, अन्य कोणत्याही धर्मीयांनी दान केलेल्या पैशाला तो नियम लागू नाही. सर्व धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांना एकसमान निर्णय व्हायला हवा, याबाबत नुकतीच एक याचिका एका आयआयटीयन विद्यार्थ्याने दाखल केली असून, न्यायालयाने ती दाखलही करून घेतली असल्याचे कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.

फोटो

१० कुलश्रेष्ठ

टॅग्स :NashikनाशिकConstitution Dayसंविधान दिन