शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

संविधानात ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द आणीबाणीत घुसडला : पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 01:31 IST

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ संविधानात नव्हता. हा शब्द अंतर्भूत करण्यात आला तो १९७६ म्हणजेच आणीबाणीदरम्यानच्या काळात. या घटनादुरुस्तीच्या काळात देशात आणीबाणी असल्याने विरोधातील अनेक पक्षांचे खासदार तुरुंगात असताना पाशवी सत्तेच्या आधारे ही घटनादुरुस्ती करण्यात आल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देमूळ संविधानात नसलेला हा शब्द तत्कालीन पाशवी सत्तेच्या आधारे अंतर्भूत केल्याचा आरोप

नाशिक : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनेत धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ संविधानात नव्हता. हा शब्द अंतर्भूत करण्यात आला तो १९७६ म्हणजेच आणीबाणीदरम्यानच्या काळात. या घटनादुरुस्तीच्या काळात देशात आणीबाणी असल्याने विरोधातील अनेक पक्षांचे खासदार तुरुंगात असताना पाशवी सत्तेच्या आधारे ही घटनादुरुस्ती करण्यात आल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिकमध्ये सोमवारी आयोजित व्याख्यानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना कुलश्रेष्ठ यांनी संविधान हे देशात सर्वतोपरी असूनही त्यात देशाला अंधारात ठेवून अनेकदा बदल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मूळ संविधानात धारा ४४ अर्थात समान नागरी कायदाचा अंतर्भाव असतानाही तो लागू का झाला नाही. आपल्या देशात आजही बहुसंख्याक जनतेला समान नागरी कायदा अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोडची मागणी करावी लागण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याप्रमाणेच १९९३ यावर्षी कुणालाही न विचारता अचानकपणे नॅशनल मायनॉरिटी कमिशन तयार करण्यात आले. अवघ्या एक टक्क्याच्या आसपास असलेल्या पारसी, बौद्ध, शीख, तर तीन टक्के असलेल्या ख्रिश्चन समुदायाबरोबर तब्बल १६ टक्क्यांहून अधिक असलेल्या मुस्लीम समाजाचाही त्यात अंतर्भाव करण्यात आला आहे, हे वास्तव आहे. शबरीमला प्रवेश प्रकरणात संबंधित जनमानसाविरोधात निकाल देऊनही त्या न्यायाधीशांना सुरक्षेची गरज भासली नाही. मात्र, नुकताच कर्नाटकात हिजाबसंदर्भात संबंधित समूहाच्या विरोधात निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा घ्यावी लागली. म्हणजे निकाल आमच्या बाजूने असेल, तरच आम्ही ऐकू, अशी मानसिकता असल्यास देशात अराजकाची परिस्थिती निर्माण होईल, असा ईशारादेखील कुलश्रेष्ठ यांनी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत गजरा फाउंडेशनचे अध्यक्ष मदन पारख उपस्थित होते.

इन्फो

याचिका दाखल

सामान्य भारतीय नागरिकांपैकी केवळ हिंदूंनी मंदिरात दान केलेला पैसाच सरकारजमा होत असून, अन्य कोणत्याही धर्मीयांनी दान केलेल्या पैशाला तो नियम लागू नाही. सर्व धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांना एकसमान निर्णय व्हायला हवा, याबाबत नुकतीच एक याचिका एका आयआयटीयन विद्यार्थ्याने दाखल केली असून, न्यायालयाने ती दाखलही करून घेतली असल्याचे कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.

फोटो

१० कुलश्रेष्ठ

टॅग्स :NashikनाशिकConstitution Dayसंविधान दिन