शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

गावकीच्या राजकारणात स्थानिक नेत्यांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:31 AM

निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांनी ग्रामीण भागातील गावे पिंजून काढण्यास सुरुवात केलेली आहे. मर्यादित लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असलेल्या गावांमध्ये प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या प्रत्येकाचा एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो गावात प्रचारासाठी आला की स्थानिक हितसंबंधासाठी विरोधी विचारसरणीच्या उमेदवारासाठीही स्थानिक नेत्यांना माईक हाती घ्यावा लागत आहे.

नाशिक : निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांनी ग्रामीण भागातील गावे पिंजून काढण्यास सुरुवात केलेली आहे. मर्यादित लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असलेल्या गावांमध्ये प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या प्रत्येकाचा एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो गावात प्रचारासाठी आला की स्थानिक हितसंबंधासाठी विरोधी विचारसरणीच्या उमेदवारासाठीही स्थानिक नेत्यांना माईक हाती घ्यावा लागत आहे. याला अपवाद काही कट्टर समर्थक गावांचा समावेश असू शकतो, मात्र तरीही थेट विरोधाची भूमिका फारशी घेतली जात नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात तरी सध्या अशाच प्रकारचे चित्र आहे.गावकीच्या राजकारणात मान-सन्मानही तितकाच महत्त्वाचा असल्याने गावात येणाऱ्या उमेदवारांना गावातील सरपंचासह इतर राजकीय पक्षांच्या मान्यवरांनादेखील आमंत्रित करावे लागते. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाची कोंडी अधिक होत असून, आलेल्या प्रत्येकाला भाऊ, आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत असे म्हणत वेळ मारून न्यावी लागत आहे. विस्तीर्ण अशा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात खेडेगावांचा परिसर असून, उमेदवारांचे बहुतांश गणित हे गावांमधील मतदारांवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचाराला प्राधान्य देणाºया उमेदवारांना रोजच नवनवीन गावे गाठावी लागत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली विधानसभा आणि इगतपुरी या मतदारसंघांचा समावेश होतो. यातील तीन मतदारसंघ असे आहेत की त्यामध्ये ७० टक्के मतदार हे ग्रामीण भागातील आहेत.उमेदवाराच्या गाड्यांचा ताफा गावात शिरला की मग गावातील मारुती मंदिर किंवा समाजमंदिरात उमेदवाराच्या प्रचारार्थ छोटेखानी सभा ठेवली जाते. अशावेळी गावातील सर्वांनाच आमंत्रित करावे लागते. यामध्ये स्थानिक पातळीवरील सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्तेही हितसंबंधासाठी आमंत्रित केले जातात.अशावेळी काही दुसºया पक्षाच्या उमेदवारासाठी दोन शब्द बोलण्याचीदेखील नामुष्की ओढावते. भाषण करतानाच आपला परिचय आणि पक्षाचा उल्लेख करताना राजकारण बाजूला ठेवून गावाचे चांगले होण्यासाठीच्या अपेक्षा व्यक्त करून भाषण उरकले जात असल्याचे चित्र आहे.नाव पुकारल्याने नाइलाजगावातील पुढाºयाच्या हातात माईक गेला की मग तो समोर दिसेलत्याचे नाव पुकारून दोन शब्द बोलण्याचा आग्रह धरतो. त्यामुळे समोरच्यालाही पक्षनिवेश बाजूला ठेवून वेळ मारून न्यावी लागते. संबंधित राजकीय नेता अशा भाषणबाजीने सुखावून जात असला तरी त्यावेळी भाषणाची वेळ आलेल्या नेत्याला काय कसरत करावी  लागते हे त्यालाच माहीत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक