शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

विकासासाठी विनाशाची प्रवृत्ती रोखायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 00:06 IST

ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात सुरू असलेल्या खोदकामाच्या विरुद्ध पर्यावरणप्रेमींच्या तीव्र भावना आणि आंदोलनाची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली. दंडात्मक कारवाई करून हे खोदकाम रोखण्याचा निर्णय झाला. महसूल विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. जणूकाही याच कर्मचाऱ्यांमुळे हे खोदकाम सुरू होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सभोवताली घडणाऱ्या या बाबींची अजिबात कल्पना नव्हती, असे भासविण्याचा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देगेल्यावर्षी अंजनेरी परिसराच्या अशाच प्रश्नाविषयी पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवलाआरोग्य यंत्रणेपुढे आव्हानकेवळ घोषणा नको

मिलिंद कुलकर्णी             पर्यावरणप्रेमींच्या सजग आणि सतर्क भूमिकेचे समाजाने स्वागतच करायला हवे. जागरूक पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नांमुळे पर्यावरणाचे रक्षण होत आहे. ज्या शासकीय विभागांवर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे, ते विभाग नेमके करतात काय, हा सामान्यांना न उलगडणारा प्रश्न आहे. सरकार बदलले की पर्यावरणाचे धोरण बदलते, हा अनुभव आहे.गेल्यावर्षी अंजनेरी परिसराच्या अशाच प्रश्नाविषयी पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवला होता. कारवाईचे नाटक तेव्हादेखील झाले होते; पण कालांतराने सगळे पूर्वपदावर आले. विकासासाठी विनाश ही संकल्पना जागतिक पातळीवरच रूढ करण्याचा आणि त्याचे जाणीवपूर्वक समर्थन करण्याचा संघटित प्रयत्न भांडवलदार करीत असतात. त्याला शासकीय, राजकीय आणि प्रशासकीय अशा तिन्ही पातळ्यांवर मूक पाठिंबा असतो. एवढ्या बलाढ्य यंत्रणेशी लढणे मूठभर पर्यावरणप्रेमींना अवघड असते. ब्रह्मगिरीच्या रूपाने मिळालेले यश कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारे आहे. म्हणून त्याचे महत्त्व आहे.आरोग्य यंत्रणेपुढे आव्हानकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक जिल्हा अग्रस्थानी होता. संपूर्ण देशात नाशिकच्या रुग्णसंख्येविषयी चर्चा होती. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, सामाजिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नांनी दुसरी लाट थोपविण्यात यश आले आहे, मात्र अजूनही ११,००० रुग्ण उपचार घेत आहेत. मृत्यूंची संख्या रोज ३० पेक्षा अधिक आहे. रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय राज्य शासनाने रहित केला आहे. त्याच्या मागील उद्देश निश्चितच चांगला आहे; परंतु सार्वजनिक रुग्णालयातील आरोग्य सेवा तसेच अन्य सेवा यांचा दर्जा वाढविण्याची आवश्यकता आहे. कोरोनापश्चात आजारांनी तोंड वर काढले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने साथरोगांचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांच्याशी मुकाबला करावा लागणार आहे.केवळ घोषणा नकोकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रशासन व समाज गाफील असताना गाठले. प्रगत देशांमध्ये दुसरी आणि तिसरी लाट सुरू असताना आम्ही मात्र पहिली लाट यशस्वीपणे रोखली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत होतो. दुसऱ्या लाटेने पितळ उघडे पडले. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा निर्धार हवेत विरला होता. पीएम केअर फंडातील काही व्हेंटिलेटर्स कार्यान्वित झाले नव्हते. ऑक्सिजन प्रकल्पाची धाव केवळ निविदा प्रक्रियेपर्यंत होती. त्यामुळे दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले. तेव्हा आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा पुरती हतबल दिसून आली. आता रुग्णसंख्या कमी होत असताना सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना रुग्णवाहिका ताब्यात मिळाल्या आहेत; परंतु त्या पूर्ण क्षमतेने वापरात नसल्याचे चित्र आहे. आता ४० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा झाली आहे. जून महिना अखेरपर्यंत हे प्रकल्प कार्यान्वित होतील असा निर्धार व्यक्त झाला आहे. तो वास्तवात उतरला तर सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट होण्यास मदत होईल. संभाव्य तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करता येईल. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासRevenue Departmentमहसूल विभाग