शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

जिल्ह्यात टॅँकरचे त्रिशतक पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:30 IST

उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक : उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्णात विक्रमी संख्येने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, मान्सूनचे यंदा उशिराने आगमन होणार असल्याने ही संख्या चारशेच्या आसपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होऊ लागल्या आहेत. धरण प्रकल्पांतही अवघा १० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांना पिण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. डिसेंबर अखेरपासूनच जिल्ह्णात टँकर सुरू करण्यात आले. टंचाई परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण राज्याचा आढावा घेत दुष्काळी उपाययोजना राबविताना मागणी आल्यास तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली असली तरी, जिल्ह्णात एकही पाणीपुरवठा योजना सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे सध्या टंचाई निवारणासाठीही प्रशासनाने टँकरवरच भर दिल्याचे दिसून येते. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांतस्तरावर देण्यात आल्याने टँकरची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्णातील २१० गावे, ८५९ वाड्या अशा १ हजार ६९ गावांना ३२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात २२ शासकीय आणि ३०३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ६९, सिन्नर तालुक्यात ६१ टँकर सुरू आहेत. टँकरच्या ८३५फेऱ्या मंजूर असून, प्रत्यक्षात ७५७ फेºया सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी २९२ टँकर सुरू होते. त्यात वाढ होत आता संख्या सव्वातीनशेच्या घरात पोहोचली आहे.तालुकानिहाय टँकरची संख्याबागलाण ३८, चांदवड १४, दिंडोरी १, देवळा १५, इगतपुरी १०, मालेगाव ४९, नांदगाव ६९, सुरगाणा ७, पेठ ३, सिन्नर ६१, त्र्यंबक ७, येवला ५१ इतके टॅँकर सुरू आहेत, तर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने २१० खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यात बागलाण २०, दिंडोरी ११, देवळा २३, इगतपुरी १०, कळवण ३७, मालेगाव ४५, नांदगाव १९, निफाड २, पेठ २६, सुरगाणा ५, सिन्नर ३, येवला ९ या विहिरींचा समावेश आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई