शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

जिल्ह्यात टॅँकरचे त्रिशतक पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:30 IST

उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक : उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्णात विक्रमी संख्येने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, मान्सूनचे यंदा उशिराने आगमन होणार असल्याने ही संख्या चारशेच्या आसपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होऊ लागल्या आहेत. धरण प्रकल्पांतही अवघा १० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांना पिण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. डिसेंबर अखेरपासूनच जिल्ह्णात टँकर सुरू करण्यात आले. टंचाई परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण राज्याचा आढावा घेत दुष्काळी उपाययोजना राबविताना मागणी आल्यास तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली असली तरी, जिल्ह्णात एकही पाणीपुरवठा योजना सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे सध्या टंचाई निवारणासाठीही प्रशासनाने टँकरवरच भर दिल्याचे दिसून येते. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांतस्तरावर देण्यात आल्याने टँकरची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्णातील २१० गावे, ८५९ वाड्या अशा १ हजार ६९ गावांना ३२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात २२ शासकीय आणि ३०३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ६९, सिन्नर तालुक्यात ६१ टँकर सुरू आहेत. टँकरच्या ८३५फेऱ्या मंजूर असून, प्रत्यक्षात ७५७ फेºया सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी २९२ टँकर सुरू होते. त्यात वाढ होत आता संख्या सव्वातीनशेच्या घरात पोहोचली आहे.तालुकानिहाय टँकरची संख्याबागलाण ३८, चांदवड १४, दिंडोरी १, देवळा १५, इगतपुरी १०, मालेगाव ४९, नांदगाव ६९, सुरगाणा ७, पेठ ३, सिन्नर ६१, त्र्यंबक ७, येवला ५१ इतके टॅँकर सुरू आहेत, तर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने २१० खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यात बागलाण २०, दिंडोरी ११, देवळा २३, इगतपुरी १०, कळवण ३७, मालेगाव ४५, नांदगाव १९, निफाड २, पेठ २६, सुरगाणा ५, सिन्नर ३, येवला ९ या विहिरींचा समावेश आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई