शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यात टॅँकरचे त्रिशतक पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:30 IST

उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक : उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्णात विक्रमी संख्येने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, मान्सूनचे यंदा उशिराने आगमन होणार असल्याने ही संख्या चारशेच्या आसपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होऊ लागल्या आहेत. धरण प्रकल्पांतही अवघा १० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांना पिण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. डिसेंबर अखेरपासूनच जिल्ह्णात टँकर सुरू करण्यात आले. टंचाई परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण राज्याचा आढावा घेत दुष्काळी उपाययोजना राबविताना मागणी आल्यास तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली असली तरी, जिल्ह्णात एकही पाणीपुरवठा योजना सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे सध्या टंचाई निवारणासाठीही प्रशासनाने टँकरवरच भर दिल्याचे दिसून येते. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांतस्तरावर देण्यात आल्याने टँकरची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्णातील २१० गावे, ८५९ वाड्या अशा १ हजार ६९ गावांना ३२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात २२ शासकीय आणि ३०३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ६९, सिन्नर तालुक्यात ६१ टँकर सुरू आहेत. टँकरच्या ८३५फेऱ्या मंजूर असून, प्रत्यक्षात ७५७ फेºया सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी २९२ टँकर सुरू होते. त्यात वाढ होत आता संख्या सव्वातीनशेच्या घरात पोहोचली आहे.तालुकानिहाय टँकरची संख्याबागलाण ३८, चांदवड १४, दिंडोरी १, देवळा १५, इगतपुरी १०, मालेगाव ४९, नांदगाव ६९, सुरगाणा ७, पेठ ३, सिन्नर ६१, त्र्यंबक ७, येवला ५१ इतके टॅँकर सुरू आहेत, तर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने २१० खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यात बागलाण २०, दिंडोरी ११, देवळा २३, इगतपुरी १०, कळवण ३७, मालेगाव ४५, नांदगाव १९, निफाड २, पेठ २६, सुरगाणा ५, सिन्नर ३, येवला ९ या विहिरींचा समावेश आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई