शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

तामिळनाडूच्या टोळीने शेतकऱ्यांना घातला ६० लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 01:25 IST

तुमच्या शेतात चंदनाची लागवड करा, रोपे आम्ही पुरवितो आणि शासकीय अनुदानदेखील मिळवून देतो’ असे आमिष दाखवून तामिळनाडू राज्यातील एका नर्सरीचे स्वत:ला सदस्य असल्याचे सांगून आठ भामट्यांच्या टोळीने जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येत सुमारे ६० लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..

ठळक मुद्देटोळीविरुद्ध गुन्हा दाखल : चंदनाची रोपे पुरविण्याचे आमिष दाखवून उकळली रक्कम

नाशिक : ‘तुमच्या शेतात चंदनाची लागवड करा, रोपे आम्ही पुरवितो आणि शासकीय अनुदानदेखील मिळवून देतो’ असे आमिष दाखवून तामिळनाडू राज्यातील एका नर्सरीचे स्वत:ला सदस्य असल्याचे सांगून आठ भामट्यांच्या टोळीने जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येत सुमारे ६० लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..

देवळा तालुक्यातील गिरणारा व अन्य काही गावांमध्ये काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या कृष्णगिरीच्या ‘श्री लक्ष्मी गणपती नर्सरी गार्डन’चे नाव घेत आठ संशयित शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते. त्यांनी ‘आम्ही तुम्हाला शासकीय अनुदान चंदनाच्या लागवडीवर मिळवून देतो, चंदनाची रोपेही पुरवितो’ असे सांगून विविध प्रलोभने व आश्वासने दिली. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करत सुमारे साठ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळून ही टोळी फरार झाली. याप्रकरणी गिरणारा गावात राहणारे विनोद कौतिक खैरनार यांना आपली व अन्य काही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा त्यांनी देवळा पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला. पाटील यांनी तत्काळ याप्रकरणी देवळा पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच तामिळनाडू येथील कृष्णगिरी कुप्पम रोडवरील ‘श्री लक्ष्मी गणपती नर्सरी गार्डनचे संशयित आनंद, नायडू, पी. सुब्रमण्यम नायडू व्यंकटाई पोथुरी यांच्यासह अन्य चार साथीदारांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--कोट--

चंदनाची रोपे पुरविण्याचे सांगून हजारो ते लाखो रुपये उकळणाऱ्या तामिळनाडूच्या संशयितांचा शोध सुरू आहे. याबाबत अधिक माहिती कोणत्याही शेतकऱ्याकडे असल्यास त्वरित देवळा पोलिसांना द्यावी. तसेच अशाप्रकारे अजून कोणा शेतकरी बांधवांची फसवणूक झाली असल्यास पोलिसांकडे येऊन तक्रार द्यावी. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याहीप्रकारे अनोळखी व्यक्तींच्या प्रलोभनांना बळी पडू नये व कुठल्याही स्वरुपाचे आर्थिक व्यवहार करू नयेत.

- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी