शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लहान मुलांना जपा, डिहायड्रेशनचा धोका; उन्हाळ्यात 'अशी' घ्या चिमुकल्यांची काळजी, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:16 IST

नाशिक : लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास उन्हाळ्यातच होतो. अतिघाम येण्यापासून अतिसार आणि उलट्या होणे, हे शरीरातील पाणी कमी होण्यास ...

नाशिक : लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास उन्हाळ्यातच होतो. अतिघाम येण्यापासून अतिसार आणि उलट्या होणे, हे शरीरातील पाणी कमी होण्यास कारणीभूत ठरतात; परंतु पालकांनी योग्य दक्षता घेतल्यास या निर्जलीकरणाला वेळीच रोखता येते. मात्र, जर त्याच्या मुख्य लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर बालकांना थेट रुग्णालयात दाखल करण्याचीही वेळ पालकांवर येऊ शकते.

डिहायड्रेशन म्हणजे काय?

डिहायड्रेशन ही अशी स्थिती आहे, जिथे शरीरातील पाणी प्रचंड प्रमाणात कमी होते. शरीरातील कार्यांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची कमतरता निर्माण करते. अखेरीस सामान्य चयापचय प्रक्रियेत व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांमध्ये निर्जलीकरण होण्याचा सर्वाधिक धोका असण्यामागे त्यांच्या शरीरात द्रवसाठा कमी असतो. विषाणू, जिवाणू किंवा परजीवी संसर्ग आणि अगदी अन्नातील ॲलर्जीमुळे होणाऱ्या पातळ शौचामुळे ही स्थिती उद्भवू शकते. उलट्या होण्यामुळे तसेच अतिसारामुळे शरीराच्या द्रवसाठा द्रुतगतीने कमी होतो. उच्च उष्णता आणि आर्द्रता यांमुळे जास्त घाम येणे, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघात होऊ शकतो. घराबाहेर प्रदीर्घ काळ खेळणारी लहान मुले डिहायड्रेशनच्या या प्रकारास बळी पडतात.

दीर्घकाळ खेळल्याने होते पाणी कमी

तोंड सतत कोरडे पडणे हे मुलांमध्ये डिहायड्रेशनचे सर्वांत पहिले चिन्ह आहे. कमी लाळ दिसते आणि कोरड्या ओठांमुळे पांढरटपणा दिसतो. बालकांना सहा ते आठ तास लघवी होत नाही किंवा खूप गडद आणि मूत्राचे प्रमाण अत्यल्प असते. दिवसभरात आपल्या शरीरातील पाण्याचा वेगवेगळ्या म्हणजेच घाम, लघवी, शौच आणि अश्रूंच्या स्वरूपांत ऱ्हास होतो. हे शरीरातील कमी झालेले द्रव आणि त्याचे क्षार, घेतलेल्या द्रवपदार्थांद्वारे आणि दिवसभर बालकांनी घेतलेल्या आहारामुळे भरून काढले जाते. त्यामुळे आपल्या शरीरास आवश्यक पातळीइतके हायड्रेट राहण्यास मदत होते. घरात किंवा घराबाहेर दोन्ही ठिकाणी दीर्घकाळ खेळल्यामुळे मुले मोठ्या प्रमाणात द्रव आणि ग्लायकोकॉलेट गमावू शकतात. जर बाळास अस्वस्थ वाटत असेल आणि ताप, अतिसार किंवा उलट्यांचा त्रास असेल तर ते डिहायड्रेशनचे कारण असू शकते. तसेच, काही वेळा तोंड, घशाच्या आजारांमुळे त्यांना पाणी किंवा इतर द्रव पिणे कठीण होऊ शकते आणि त्यामुळेसुद्धा निर्जलीकरण होऊ शकते.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स