शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

तहसीलदार, बीडीओंना निलंबित करण्याची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:14 AM

नाशिक : ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यावर त्यांच्या निवडणुकी-बाबतची अचूक माहिती न पाठविल्यास संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदारास जबाबदार धरून थेट निलंबनाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. त्याचबरोबर हगणदारीमुक्त व ग्रामपंचायतींच्या अतिक्रमणाबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर करणाऱ्यांवरही यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक चुकीची माहिती दिल्यास कारवाई

नाशिक : ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यावर त्यांच्या निवडणुकी-बाबतची अचूक माहिती न पाठविल्यास संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदारास जबाबदार धरून थेट निलंबनाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. त्याचबरोबर हगणदारीमुक्त व ग्रामपंचायतींच्या अतिक्रमणाबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर करणाऱ्यांवरही यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, नाशिक या तालुक्यातील काही ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत टळून गेल्यावरही त्यांच्या निवडणुका घेण्यासाठी अचूक माहिती न दिल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या मुदतीत निवडणुका घेता आल्या नाहीत, त्याबाबत निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेऊन नाशिक जिल्ह्णाच्या कामकाजाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्यामुळे भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व गटविकास अधिकारी व तहसीलदारांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी सर्वांनाच धारेवर धरत ग्रामपंचायतींची माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची अशी विचारणा केली. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जी पहिली बैठक ग्रामपंचायतीची होईल त्या तारखेपासून ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी धरला जात असताना त्याबाबतची माहिती गटविकास अधिकाºयास असणे क्रमप्राप्त असल्याचेही त्यांनी सांगितले.या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी गटविकास अधिकाºयांना धारेवर धरताना ग्रामपंचायत सदस्यांबाबत चुकीची माहिती प्रशासनाला दिली जात असल्याचा ठपका ठेवला. एकीकडे संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा दावा केला जात असताना ग्रामपंचायत सदस्य वा सरपंचाकडे शौचालय नसल्याचे अपिले कशी काय दाखल केली जातात, असा सवाल त्यांनी विचारला व याबाबत गावपातळीवरूनच दिशाभूल व चुकीची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतींच्या जागेवर अतिक्रमणाची बाबही अशाच प्रकारची असून, सदस्यांकडून अतिक्रमण केले जात असताना ग्रामसेवक कधी अतिक्रमण झाले नाही, असा अहवाल देतो व कधी अतिक्रमण केले आहे, अशी दुहेरी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याने त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी गटविकास अधिकाºयांची असल्याचे सांगितले.सरपंचाची निवडणूक तहसील कार्यालयामार्फत पार पाडली जात असल्यामुळे त्यांनीही याबाबत जागरूक राहणे गरजेचे असून, यापुढे ग्रामपंचायतीची माहिती पाठविण्याची संयुक्त जबाबदारी गटविकास अधिकारी व तहसीलदारांची असून, त्यात कुचराई केल्यास थेट निलंबित करण्यात येईल, असा इशारा दिला

टॅग्स :Governmentसरकार