शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

स्विडनचा अभियंता सायकलवर स्वार; दहा महिन्यांत ओलांडल्या १७ देशांच्या सीमा

By azhar.sheikh | Updated: May 9, 2018 15:43 IST

स्वीडन देशाचा रहिवाशी असलेला व पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण आपल्या सायकलींगच्या छंदापोटी चक्क जगभ्रमंतीला निघाला आहे. त्याने तीनशे दिवसांत १७ देशांच्या सीमा ओलांडल्या असून भारतात दाखला झाला आहे.

ठळक मुद्दे नाशिकमधील दिलासा केअर सेंटर या वृध्दाश्रमात मुक्काममंगळवारी (दि.८) त्याने मालेगावच्या दिशेने सायकल दामटविली पुढील चार वर्षे सायकलवरचकुठलाही विक्रमच्या उद्देशाने तो सायकलभ्रमंती करीत नाही

नाशिक : ‘हा छंद जीवाला लावी पिसे’ असे एका गीतकाराने म्हटले आहे, ते उगीच नाही. एखादा छंद जेव्हा माणसाला जडतो तेव्हा त्या छंदासाठी तो सर्व काही पणाला लावतो. स्वीडन देशाचा रहिवाशी असलेला व पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण आपल्या सायकलींगच्या छंदापोटी चक्क जगभ्रमंतीला निघाला आहे. त्याने तीनशे दिवसांत १७ देशांच्या सीमा ओलांडल्या असून भारतात दाखला झाला आहे.स्वीडन येथील लिनस हा २९ वर्षांचा तरुण दहा महिन्यांपुर्वी सायकलने स्विडनमधून जगभ्रमंतीसाठी निघाला. त्याने आपल्या आजपर्यंतच्या प्रवासात पाच दहा नव्हे तर १७ देशांच्या सीमा यशस्वीरित्या ओलांडल्या आहेत. भारत हा त्याचा १८वा क्रमांकाचा देश ठरला. संपुर्ण अभ्यास, आरोग्याच्या दृष्टीने आहार, आराम आणि सायकलिंगचे दिवसाचे किलोमीटर असा सर्व शास्त्रोक्त तंतोतंत नियोजनानुसार लिनस जगभ्रमंती सायकलवरुन करत आहे. यामागे त्याचा केवळ छंद असून कुठलाही विक्रम किंवा प्रसिध्दी मिळविण्याच्या उद्देशाने तो सायकलभ्रमंती करीत नाही. भारतात दाखल झाल्यानंतर त्याने इंटरनेटच्या माध्यमातून मिळविलेल्या नाशिकमधील लेखानगर भागातील दिलासा केअर सेंटर या वृध्दाश्रमात दोन दिवस स्वयंस्फूर्तीने मुक्काम केला. येथील आजी-आजोबांसोबत गप्पागोष्टी करत तो चांगलाच रमला. दोन दिवसांचा मुक्काम पुर्ण करुन मंगळवारी (दि.८) त्याने मालेगावच्या दिशेने सायकल दामटविली. खाण्यापिण्याचे सामान, कपडे, बुट असा सर्व लवाजमा असलेल्या बॅग रेंजरप्रकारच्या सायकलवर टांगून तो जगभ्रमंती करीत आहे. शरीरयष्टीने उंचपुरा धडधाकट असलेला लिनस सायकलवरुन जग फिरत आहे.

पुढील चार वर्षे सायकलवरचलिनस हा त्याच्या मायदेशी पुढील चार वर्षानंतर परतणार आहे. तोपर्यंत त्याचे आयुष्य हे सायकलच्या चाकांवरच फिरणार आहे. भारतासह १८ देशांची भ्रमंती पूर्ण के ल्यानंतर लिनस नेपाळच्या सीमेमध्ये प्रवेश करणार आहे. भारतामध्ये त्याला अधिवासासाठी ६० दिवसांचा व्हिसा मिळाला आहे. तोपर्यंत तो महत्त्वाच्या शहरांमधून मार्गस्थ होत प्रसिध्द ठिकाणांना भेटी देत नेपाळ सीमेत दाखल होणार आहे.भारत हा सुंदर देश असल्याचे मला जाणवले. भारताच्या सीमेत दाखल झाल्यानंतर एक वेगळ्याप्रकारचा मी अनुभव घेतला. बलाढ्य लोकशाही असलेला आणि वैविध्यपुर्ण भारतीय संस्कृती अनुभवण्यासाठी मला ६० दिवसही अपुरे पडणार.-लिनस, छंदवेडा सायकलपटू

टॅग्स :tourismपर्यटनNashikनाशिकIndiaभारत