शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

गणेशमूर्ती संकलनात घट झाल्याने आश्चर्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:50 IST

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा वादाचा मुद्दा ठरला असून, मनपाच्या दाव्याविषयी चळवळीतील कार्यकर्त्यांनी काहीशी शंका व्यक्त केली आहे.

नाशिक : पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा वादाचा मुद्दा ठरला असून, मनपाच्या दाव्याविषयी चळवळीतील कार्यकर्त्यांनी काहीशी शंका व्यक्त केली आहे.पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ आता जोर धरू लागली आहे. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेतून नाशिकमध्ये १९९८ मध्ये विसर्जित मूर्ती आणि निर्माल्य संकलन करण्याची मोहीम सुरू झाली. दुसऱ्या वर्षापासून त्यासाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घेतला आणि आता तर विविध संस्था संघटना मूर्ती संकलनात प्रत्यक्ष सहभागी होत असल्याने ही जनचळवळ झाली आहे. नाशिकमध्ये १ लाख ९५ हजार मूर्ती संकलनाचा यापूर्वी उच्चांक झाला आहे. मात्र दोन ते तीन वर्षांत घट होऊ लागली आहे. यंदाच्या वर्षी १ लाख १६ हजार ८९६ इतक्या मूर्ती संकलित झाल्या. गतवर्षीच्या तुलनेत त्यात ५३ हजाराने घट झाली असून, त्यामुळे अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी शंका उपस्थित केली आहे.  नाशिक महापालिकेने मात्र घरोघर शाडूमातीचे गणपती तयार करणे आणि बसविणे या बाबी वाढल्या आहेत.  शिवाय कृत्रिम तलाव किंवा घरीच मूर्ती विसर्जित करण्याचे प्रकार वाढल्याने घट झाल्याचा दावा केला आहे. अलीकडे गणेशोत्सवापूर्वीच शाळा आणि अन्य ठिकाणी शाडूमातीच्या मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा होतात शिवाय नागरिकांत पर्यावरण जागृती वाढली आहे. त्याचा अनुकूल परिणाम दिसून येत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. याशिवाय महापालिकेच्या वतीने यंदा ४६ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. त्यातही मूर्ती विसर्जित केल्या जातात. शिवाय नागरिक घरगुती विसर्जनदेखील करतात, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाganpatiगणपतीpollutionप्रदूषणenvironmentवातावरणsocial workerसमाजसेवक