शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

उन्हाळ कांदा सडला, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 2:15 PM

जळगाव नेऊर : वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, कधी उत्पादन जास्त तर भाव कमी, तर कधी उत्पादन कमी तर भाव जास्त. सरकारचे धरसोड धोरण, बाजार पेठेतील असुरक्षित ...

जळगाव नेऊर : वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, कधी उत्पादन जास्त तर भाव कमी, तर कधी उत्पादन कमी तर भाव जास्त. सरकारचे धरसोड धोरण, बाजार पेठेतील असुरक्षित वातावरण, कोणत्याही अधिक उत्पादित मालाच्या निर्यातीच्या ठोस योजना नाही की भावाबाबत ठोस आश्वासन नसल्याने बºयाच वेळा शेतीमाल रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकºयांच्या नशिबी आली आहे. एक रु पया खर्चून पंचविस पैसे कमवायचे अशी स्थिती शेतकºयांवर आली आहे. आँगस्ट महिन्यात सुरू असलेल्या रिमझिम पाऊस व गारव्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांचा कांदा चाळीतच सडला आहे. सुरवातीला पोळ कांद्याला भाव असल्याने झालेल्या चार पैशातून मोठ्या प्रमाणात खर्च शेतकºयांनी उन्हाळ कांद्यावर केला. साधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून उन्हाळ कांद्याची रोपे टाकण्याची लगबग सुरु होते. म्हणजे रोपे टाकण्यापासुन एक वर्षाचा कालावधी उन्हाळ कांद्याला झालेला आहे. उन बेमोसमी पाऊस, गारा , खराब हवामान या संकटातून उन्हाळ कांद्याचे पिक वाचवुन साठवलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. आज मिळणा-या भावातून शेतकºयांचा खर्चही वसुल होत नसल्याने पर्यायाने मिळेल त्या भावात कांदा विक्र ी करावा लागत आहे.********************कांद्याचे उळे टाकण्यापासून आज वर्षाचा कालावधी संपत आलेला आहे पण सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे चाळीमध्ये साठविलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब होत असल्याने कवडीमोल भावाने विकणे अथवा उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालून कांदयांस किमान दोन हजार रूपये हमी भाव द्यावा व शेतक-यांना आधार द्यावा.-केदारनाथ कुराडे, कांदा उत्पादक शेतकरी, जळगाव नेऊर

टॅग्स :Nashikनाशिक