शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या

By admin | Updated: June 28, 2016 01:06 IST

दोन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आत्महत्त्या

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सोमवारी पुन्हा त्र्यंबक व निफाड तालुक्यांतील दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. चालू वर्षी आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५२ वर पोहोचली असून, या वाढत्या घटनांनी प्रशासन चिंतित सापडले आहे. दशरथ त्र्यंबक भोये (४२) व शांताराम नथू वाजे (६०) असे या दोघांची नावे आहेत. भोये हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपूर येथील रहिवासी असून, त्यांच्या नावे दोन एकर जमीन आहे. नापिकी व आर्थिक विवंचनेतून २२ जून रोजी घरातच गळफास घेऊन त्यांनी आत्महत्त्या केली. दोन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला याची माहिती दिली. तहसीलदारांनी त्यांच्या घरी भेट दिली असता, प्रथम दर्शनी कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगण्यात आले. दुसरी घटना निफाड तालुक्यातील श्रीरामपूर येथे घडली शांताराम वाजे यांनी मध्यरात्री राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्त्या केली. वाजे यांच्या स्वत:च्या नावावर शेतजमीन नसली तरी, पत्नी रेखाबाई हिच्या नावावर ६२ आर इतकी जमीन आहे. दरम्यान, जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सहा महिन्यांत ५२ इतकी झाली असून, दरमहिन्याला सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्त्या करू लागल्याने प्रशासन चिंतित सापडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी गावपातळीवर समुपदेशन शिबिरे घेतली जात आहेत. (प्रतिनिधी)