शहरात दोघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:50+5:302021-01-08T04:43:50+5:30
--- तडीपार गुंडांना ठाेकल्या बेड्या नाशिक : शहरासह जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरात वावरताना आढळून आल्याने पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...

शहरात दोघांची आत्महत्या
---
तडीपार गुंडांना ठाेकल्या बेड्या
नाशिक : शहरासह जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरात वावरताना आढळून आल्याने पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अतुल उर्फ नवख्या उर्फ केतन नारायण नाव्हकर (रा. राजरत्न नगर) या तडीपार गुंडाला मध्यवर्ती शाखेच्या पथकाने सिडकोमधून ताब्यात घेतले आहे. अतुलला वर्षभरासाठी तडीपार केलेले असतानाही, तो शहरात फिरत असल्याने त्यास ताब्यात घेत, त्याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच देवळाली कॅम्प पोलिसांनी संजय गांधीनगर झोपडपट्टी परिसरात कारवाई करून अक्षय बलराज क्षत्रिय (२२) या तडीपार गुंडाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तलवारही जप्त करण्यात आली आहे. अक्षयला तडीपार केलेले असतानाही तो शहरात फिरताना आढळून आला.
--
पादचाऱ्यास धक्काबुक्की करत मोबाइल पळविला
नाशिक पादचारी व्यक्तीस धक्काबुक्की करून दोघांनी मिळून मोबाइल हिसकावून नेल्याची घटना मेनरोड ते शालिमार दरम्यान घडली. या प्रकरणी नरेश बी. शहा (५२, रा. हुंडिवाला लेन, भद्रकाली) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. शहा हे शनिवारी (दि.२) सकाळी शालिमारच्या दिशेने जात असताना, दोघा चोरट्यांनी शहा यांच्याशी झटापट करून मोबाइल हिसकावून नेला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत.