शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावला सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By श्याम बागुल | Updated: November 2, 2018 15:52 IST

जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतकºयांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे.

ठळक मुद्देबागलाण, दिंडोरी खालोखाल : आॅक्टोंबरमध्ये उच्चांक

नाशिक : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक असून गेल्या दहा महिन्यात ८५ शेतक-यांनी विविध माध्यमांचा वापर करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात करण्यात आल्या असून, त्या खालोखाल बागलाण व दिंडोरी या दोन तालुक्यातील शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारीपासून सुरू झालेल्या या सत्रात आॅगष्ट व आॅक्टोंबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतक-यांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे. या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे १३ व १२ शेतक-यांनी चालू वर्षी आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षी निफाडमध्ये दिंडोरीपेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. निफाडमध्ये १३ तर दिंडोरीत ११ शेतक-यांनी जीवन संपविले होते. यंदा मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. नेहमीच टंचाईचा सामना करणा-या बागलाण तालुक्यात गेल्या वर्षी व यंदाही १३ शेतक-यांनी आत्तापर्यंत आत्महत्येचा मार्ग धरला आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतक-यांचे दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले होते. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या कमी होतील असा अंदाज बांधला जात असताना गेल्या वर्षी आॅक्टोंबर अखेर ९५ शेतक-यांनी आत्महत्या केली होती. यंदा हे प्रमाण १० ने घटले असले तरी, यंदा पावसाने फिरविलेली पाठ, खरीप व रब्बीचे झालेले नुकसान, भीषण पाणी टंचाई, जनावरांच्या चा-या, पाण्याचा प्रश्न पाहता शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता शेतीतील जाणकार व्यक्त करीत आहेत.चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटना घडू लागल्या असून, दरमहिन्याला साधारणत: सात ते आठ शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करू लागले आहेत. आॅक्टोंबर अखेर ८५ शेतक-यांनी आत्महत्या केली असून, त्यातील शासकीय मदतीसाठी १७ शेतकरी पात्र ठरले तर ३० शेतक-यांच्या आत्महत्येचे कारणे वेगळी असल्याने त्यांना मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. ३८ शेतक-यांबाबत निर्णय प्रलंबीत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक