शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

मालेगावला सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By श्याम बागुल | Updated: November 2, 2018 15:52 IST

जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतकºयांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे.

ठळक मुद्देबागलाण, दिंडोरी खालोखाल : आॅक्टोंबरमध्ये उच्चांक

नाशिक : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक असून गेल्या दहा महिन्यात ८५ शेतक-यांनी विविध माध्यमांचा वापर करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात करण्यात आल्या असून, त्या खालोखाल बागलाण व दिंडोरी या दोन तालुक्यातील शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारीपासून सुरू झालेल्या या सत्रात आॅगष्ट व आॅक्टोंबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, दिंडोरी व निफाड हे दोन्ही तालुके मुबलक पाण्यामुळे सधन म्हणून गणले जातात. धरण व नदीच्या पाण्याची मुबलकता लक्षात घेता द्राक्ष, कांदा, भाजीपाला पिकविण्याकडे येथील शेतक-यांचा कल असला तरी, गेल्या वर्षापासून येथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे. या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे १३ व १२ शेतक-यांनी चालू वर्षी आत्महत्या केली आहे. गेल्या वर्षी निफाडमध्ये दिंडोरीपेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या. निफाडमध्ये १३ तर दिंडोरीत ११ शेतक-यांनी जीवन संपविले होते. यंदा मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. नेहमीच टंचाईचा सामना करणा-या बागलाण तालुक्यात गेल्या वर्षी व यंदाही १३ शेतक-यांनी आत्तापर्यंत आत्महत्येचा मार्ग धरला आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने शेतक-यांचे दिड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले होते. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या कमी होतील असा अंदाज बांधला जात असताना गेल्या वर्षी आॅक्टोंबर अखेर ९५ शेतक-यांनी आत्महत्या केली होती. यंदा हे प्रमाण १० ने घटले असले तरी, यंदा पावसाने फिरविलेली पाठ, खरीप व रब्बीचे झालेले नुकसान, भीषण पाणी टंचाई, जनावरांच्या चा-या, पाण्याचा प्रश्न पाहता शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता शेतीतील जाणकार व्यक्त करीत आहेत.चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटना घडू लागल्या असून, दरमहिन्याला साधारणत: सात ते आठ शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करू लागले आहेत. आॅक्टोंबर अखेर ८५ शेतक-यांनी आत्महत्या केली असून, त्यातील शासकीय मदतीसाठी १७ शेतकरी पात्र ठरले तर ३० शेतक-यांच्या आत्महत्येचे कारणे वेगळी असल्याने त्यांना मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. ३८ शेतक-यांबाबत निर्णय प्रलंबीत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक