वाईट स्वप्नांमुळे महिलेची जाळून घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:34 IST2019-02-08T23:21:41+5:302019-02-09T00:34:22+5:30
वाईट स्वप्नांमुळे चाळीस वर्षीय महिलेने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास पाथर्डी गावातील मारुती मंदिरासमोर घडली़

वाईट स्वप्नांमुळे महिलेची जाळून घेत आत्महत्या
नाशिक : वाईट स्वप्नांमुळे चाळीस वर्षीय महिलेने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़७) रात्रीच्या सुमारास पाथर्डी गावातील मारुती मंदिरासमोर घडली़ जयश्री दिलीप भगत असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री भगत यांना झोपेत वाईट स्वप्ने पडत असल्याने त्या मानसिक तणावाखाली होत्या़ गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले़ यानंतर त्यांना भाजलेल्या अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.