नाशिक : पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) रविवारी (दि. 18) दोन सत्रांत होत असून, परीक्षेत यंदा विद्यार्थ्यांना तीनऐवजी दोनच पेपर सोडवावे लागणार आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 43 हजार 604 विद्यार्थी दोन्ही गटांत प्रविष्ट झाले आहेत.प्राथमिक शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन केले असून, रविवारी सकाळी 11.30 वाजता पहिल्या सत्रत प्रथम भाषा व गणित विषयाचे एकूण 75 बहुपर्यायी प्रश्न असतील, तर दुस:या सत्रत 1.30 ते 3 वाजेच्या कालावधीत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा पेपर होणार आहे. प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी आहे. दोन्ही पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना दीड तासांचा कालावधी मिळणार आहे. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी आदी भाषांतील कार्बनलेस उत्तरपत्रिका दिल्या जाणार असून, यंदा तीनऐवजी दोनच पेपर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेनंतर शिष्यवृत्ती पात्रतेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणो आवश्यक आहे. या परीक्षेसाठी पाचवीचे 24 हजार 644 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यांची परीक्षा वेगवेगळ्या 153 केंद्रांवर आसनव्यवस्था केलेली आहे. तसेच आठवीच्या 18 हजार 960 विद्याथ्र्याची 124 केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा नियोजन नियंत्रणासाठी केंद्रनिहाय संचालकांची नियुक्ती करण्यात आली असून, शुक्र वारी (दि.16) शासकीय कन्या शाळेतून त्यांना परीक्षा साहित्य वितरीत करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कसून तयारी केली असून, त्यांच्या अभ्यासाची रविवारी कसोटी लागणार आहे.