शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

एमबीएचे प्रवेश रखडल्याचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:29 IST

राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ तीन महिने उलटल्यानंतरही सुरूच असून, अजून प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, या याचिकेवर २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेशप्रक्रियेला स्थगिती असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, राज्यभरातील एमबीए प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थी व पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. यावर्षी तंत्रशिक्षण प्रवेशप्रक्रियेत सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू असून, या गोंधळास सरकारचे शैक्षणिक क्षेत्रातील धरसोडीचे धोरण जबाबदार असल्याची प्रतक्रिया टीका शैक्षणिक क्षेत्रातून उमटत आहे. 

नाशिक: राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ तीन महिने उलटल्यानंतरही सुरूच असून, अजून प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, या याचिकेवर २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेशप्रक्रियेला स्थगिती असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, राज्यभरातील एमबीए प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थी व पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. यावर्षी तंत्रशिक्षण प्रवेशप्रक्रियेत सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू असून, या गोंधळास सरकारचे शैक्षणिक क्षेत्रातील धरसोडीचे धोरण जबाबदार असल्याची प्रतक्रिया टीका शैक्षणिक क्षेत्रातून उमटत आहे. राज्यातील तंत्र व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रि या राबविण्यात ‘सार’ प्रणाली अपयशी ठरल्याने सरकारने विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया राबविण्याची जबाबदारी महासीईटी व तंत्रशिक्षण संचालनालयावर सोपविली होती. त्यानंतर एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या जागावाटपावर मुंबईतील स्वायत्त झालेल्या महाविद्यालयांनी जागावाटपात महासीईटीने स्वायत्त दर्जा ग्राह्य धरला नसल्याचे निदर्शनास आणून देत मुंबई उच्च न्यायालयात प्रवेशप्रक्रियेला आव्हान दिल्याने न्यायालयाने नव्याने प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे पहिल्या फेरीत झालेले प्रवेशही रद्द करण्यात आले. पहिल्या फेरीतील प्रवेश रद्द झाल्यामुळे सीईटी सेलतर्फे  पुन्हा नव्याने प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने प्रवेशप्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे एमबीएच्या प्रवेशप्रक्रियेला अतिविलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या एमबीए प्रवेशप्रक्रियेमुळे एमबीएच्या प्रथम सत्रातील परीक्षा आणि प्रथम वर्षातील इंटर्नशीपही लांबण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संधी गमविण्याची भीती निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी