शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

जनसंघर्षाचा लढा सुरूच राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:23 IST

नाशिक : सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. जनसंघर्ष यात्रेदरम्यान जनताच काँग्रेसचे सरकार आले पाहिजे, अशी भावना व्यक्त करीत आहे. महाराष्टÑाच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी कॉँग्रेसने जनसंघर्ष यात्रेतून परिवर्तनाची मशाल पेटवली आहे. नाकर्त्या सरकारला सत्तेवरून खाली खेचेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा घणाघात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे जिल्ह्यात आगमन

नाशिक : सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. जनसंघर्ष यात्रेदरम्यान जनताच काँग्रेसचे सरकार आले पाहिजे, अशी भावना व्यक्त करीत आहे. महाराष्टÑाच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी कॉँग्रेसने जनसंघर्ष यात्रेतून परिवर्तनाची मशाल पेटवली आहे. नाकर्त्या सरकारला सत्तेवरून खाली खेचेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा घणाघात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यानिमित्त गोदाकाठी आयोजित जाहीर सभेत खासदार चव्हाण बोलत होते. दुसºया टप्प्यातील या यात्रेचे जिल्ह्णात आगमन झाले.  रविवारी मालेगाव, सटाणा, चांदवड येथे सभा आटोपून सायंकाळी नाशकात यात्रा पोहोचली. खासदार चव्हाण पुढे म्हणाले, कॉँग्रेस ज्यावेळी विरोधी पक्षात होती, त्यावेळी सरकारच्या देशहिताच्या निर्णयाला पाठिंबा दिला, परंतु ज्या ज्या वेळी सरकार स्वत:चे खिसे भरायला लागले त्यावेळी कॉँगे्रसने विरोधही केला आहे. त्यामुळे सध्याचे सरकार भ्रष्टाचार करून मिळवलेल्या पैशामुळे मस्तवाल झाले आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच ध्येय ठरवून सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकारला शेतकरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, सर्वसामान्य गरीब जनतेच्या प्रश्नांचे काही देणे-घेणे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.नाशिक दौºयावर नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन सातशे कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याच्या घोेषणेचा खासदार चव्हाण यांनी उल्लेख केला. मेट्रो, स्मार्ट सिटीसाठी विविध घोषणा करून आगामी निवडणुकीसाठी मतदानाची तयारी फडणवीस यांनी केली असली तरी, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करणाºया फडणवीस यांनी एक रुपयाही फेकून मारला नाही, त्यामुळे अगोदर त्यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे व मगच नाशिकच्या विकासाच्या बाता माराव्यात, असे आवाहन करून शेतकरी कर्जमाफीचे पैसे शेतकºयांपर्यंत पोहोचले नाहीत व कोट्यवधीच्या घोषणा कशा करतात, असा सवालही त्यांनी केला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राफेलचा भ्रष्टाचार व त्यात नरेंद्र मोदींचा सहभाग याच मुद्द्यावर लढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. राफेलप्रश्नी सरकारची बाजू मांडण्याची जबाबदारी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यावर सोपवण्यात आली असून, त्यांनी गोदातीरी यावे व आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे खुले आव्हान चव्हाण यांनी दिले. देशातील आर्थिक व्यवसाय अतिशय बिकट झाली असून, ३५ लाख कोटी रुपये इंधन दरवाढीतून सरकारने तुमच्या आमच्या खिशातून कमाविले तर दुसरीकडे उद्योगपतींना कर्ज माफ केले, असा आरोपही त्यांनी केला. सर्व पातळीवर सरकार अपयशी ठरल्याने येणाºया निवडणुकीत मोदींना घरी बसविण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी, देशातील सरकारने शेतकरी, व्यापाराची फसवणूक केली असून, शेतकरी देशोधडीला लागल्याने व्यापारी अडचणीत सापडले आहेत. शेतकरी कर्जमाफी म्हणजे राजा उदार, हाती भोपळा दिला अशी असून, संपूर्ण देश सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याने तुमच्यातील नाराजी व असंतोषाला वाट करून देण्याची वेळ निवडणुकीच्या निमित्ताने उभी ठाकली असून, त्याचा पुरेपूर फायदा घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रवक्ते सचिन सावंत, राजू वाघमारे, गणेश उन्हवणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शरद अहेर यांनी केले. सभेस आमदार डॉ. सुधीर तांबे, निर्मला गावित, माजी मंत्री शोभा बच्छाव, विनायकदादा पाटील, जयप्रकाश छाजेड, राजाराम पानगव्हाणे, तुषार शेवाळे, प्रताप वाघ, वत्सला खैरे, वसंत ठाकूर, सुरेश मारू, शाहू खैरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.भामरेंना राफेल नव्हे ‘रायफल’ कळतेआपल्या भाषणात खासदार चव्हाण यांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यावर टीका केली. राफेलप्रश्नी त्यांना काहीही माहीत नाही असे सांगून, भामरे यांना राफेल नव्हे तर ‘रायफल’ कळते. दोन-चार तहसीलदार, दोन-तीन प्रांत अधिकारी, चार-दोन पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांमध्येच त्यांना रस असून, देशाच्या प्रश्नावर त्यांचे ज्ञान जेमतेम असल्याचे सांगितले.चव्हाण यांना आरोग्यप्रश्नी चिंताप्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नाशिक शहराच्या ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असून, डेंग्यू, स्वाइन फ्लूने थैमान घातलेले असताना निव्वळ विकासाच्या घोषणा करणाºया सरकारने शहराची वाट लावल्याचा आरोप केला. जिवंत माणसे वाचवा, असे आवाहन करून, भाजप सरकार बोलायला स्मार्ट परंतु कर्तृत्वावर शून्य असल्याची टीकाही त्यांनी केली. नाशिककरांना दत्तक नव्हे तर सावत्र म्हणूनच वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.