शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वादळाने पेठ तालुक्यात लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 8:28 PM

पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरोना काळात अवकाळीचे संकट आल्याने आदिवासी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहेत.

ठळक मुद्देकोरोनात अवकाळी : घरांसह आंबा पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरोना काळात अवकाळीचे संकट आल्याने आदिवासी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहेत.२०५ हेक्टर आंबा भुईसपाटपेठ तालुक्यात गत पाच दहा वर्षांपासून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून, शेतकरी केशर, हापूस, राजापुरी या अधिक उत्पादन देणाऱ्या आंबा फळांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. याही वर्षी कोरोना व लॉकडाऊन यामुळे हाताला काम नसल्याने किमान आंब्याच्या विक्रीतून तरी घरखर्च भागविला जाईल, अशी आशा असताना ऐन पक्वतेत आलेला आंबा भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे.तालुका कृषी विभागाच्या अहवालानुसार ९३ गावांतील १,४८० शेतकऱ्यांच्या २०५ हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकाचे नुकसान झाले असून, तालुकास्तरीय यंत्रणेला पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी सांगितले.घरांसह शासकीय इमारतींची पडझडवादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये राहत्या घरांची पडझड झाल्याने कौले, लाकडे व संसारोपयोगी सामानाचे नुकसान झाले, तर हरणगाव, आसरबारी, आमडोंगरा, धुळघाट आदी गावांतील शाळा व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी असले, तरी प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नुकसानीची तीव्रता अधिक जाणवली आहे. तालुक्यातील ६५ घरांचे वादळात अंशतः नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार संदीप भोसले यांनी दिली. 

टॅग्स :talukaतालुकाgram panchayatग्राम पंचायत