शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

वीज खांबांमुळे वाहतुकीला अडथळा

By admin | Updated: April 30, 2017 00:38 IST

कळवण : बी. के. कॉम्प्लेक्सजवळ उभे असलेले रोहित्र रस्त्यांच्या विकासाला डोकेदुखी ठरत असून, ते हटवावे, अशी अपेक्षा मागणी नागरिकांनी केली आहे.

 कळवण : कळवण नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर येथील डॉ. सुभाषचंद्र न्याती हॉस्पिटल ते हनुमान मंदिर या रस्त्यावरील बी. के. कॉम्प्लेक्सजवळ उभे असलेले रोहित्र रस्त्यांच्या विकासाला डोकेदुखी ठरत असून, ते हटवावे, अशी अपेक्षा मागणी नागरिकांनी केली आहे.नगरपंचायत असलेल्या कळवण शहराचा दिवसागणिक विस्तार वाढत आहे. त्यामानाने शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर वाहतुकीला वीज वितरण कंपनीने वीजपुरवठ्यासाठी उभारलेले विजेचे खांब व रोहित्र हे अडथळा ठरू पाहत असल्याने त्यांचे सर्वेक्षण करून सदर खांब व रोहित्र हटविण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाजीनगरमधील बी. के. कॉम्प्लेक्ससमोर उभे असलेले रोहित्र वाहतुकीला अडचणीचे ठरत आहे. रोहित्र अगदी रस्त्यावरच असल्याने जवळून जातानादेखील जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. तेथून जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात लग्न व अन्य कार्याच्या वेळी आलेले पाहुणे रोहित्राभोवतीच वाहने लावत असल्याने येथे दुतर्फा वाहतुकीची कोंडी होते. येथूनच पुढे असलेल्या डॉ. वाघ हॉस्पिटलजवळ हीच स्थिती आहे. शिवाजीनगरमधील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम नगरपंचायतने हाती घेतले असून रस्त्यांच्या रुंदीकरणास अडथळे ठरू पाहत असलेले रोहित्र व वीजखांब वीज वितरणने अन्यत्र हलवावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे .डॉ. वाघ हॉस्पिटलसमोर रामदास दशपुत्रे यांचे दुकान व घराच्या बांधकामामुळे रस्ता अतिशय अरुंद स्वरूपाचा झाला आहे. एकाच वेळी दुसरे वाहन पास होणे दुरापास्त आहे. येथील औषध दुकानाजवळील एकूण चार वीजखांब वाहतुकीला अडचणीचे ठरत आहे. याच रस्त्यावर पुढे जवळपास ५ ते ६ खांब आहेत. सिद्धिदाता हॉस्पिटलमध्ये तातडीचे रुग्ण आल्यानंतर अरुंद झालेल्या रस्त्यामुळे व विजेच्या खांबांमुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहे. हॉस्पिटलसमोर रुग्णांची त्यांच्या नातेवाइकांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे वाहनचालकांना तेथून मार्ग काढणे अवघड होत आहे. दुरून दुसऱ्या मार्गाचा अवलंब करीत वाहनधारकांना मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने नियोजन करून अडथळा निर्माण करणाऱ्या वीजखांबांचे सर्वेक्षण करून येथील ते इतरत्र हलवावे तसेच येथील अनावश्यक विजेचे खांब कमी करता येणे शक्य असल्याने या कामात यंत्रणेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सिद्धिदाता हॉस्पिटलच्या पुढे कलावती मंदिराकडे जाताना रस्त्याच्या बाजूला रोहित्र उभे असून, त्या समोरील मालपुरे बंधंूनी रस्त्यावरच घरे बांधली असल्याने रोहित्र आणि अतिक्रमित घरामुळे रस्ता अरुंद झाला आहे. एकाच वेळी दोन वाहने पास होणे अवघड झाले आहे. रस्त्याला लागूनचे रोहित्र असल्याने भीती वाटते. हे रोहित्र डोकेदुखी ठरत आहे. उपयुक्त नसलेले वीज खांबही अजूनही ‘जैसे थे’ उभे आहेत.शहरातील अनेक ठिकाणच्या खांबांची दुरवस्था झाली आहे. काही खांब वाकले आहेत, तर काही जीर्ण झाले आहेत. शहरात सर्वत्र सीमेंटचे जंगल (घर, बंगले) झाल्याने रस्तेदेखील सीमेंटची झाली आहेत. पर्यायाने रस्त्यांची उंची वाढल्याने शहरात वीजपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या वीज तारा खाली आल्या आहेत. त्यामुळे कळवण शहरातील विविध भागांचे वीज वितरण कंपनीने सर्वेक्षण करून उपाययोजना केली तर बहुतांशी विजेचे खांब काढता येणे शक्य असल्याचे मत कळवणकरांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)