चाळीत साठवलेल्या कांद्यालाही बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 07:49 PM2021-05-31T19:49:06+5:302021-06-01T00:25:54+5:30

नाशिक : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या उन्हाळी कांद्यास आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने, मिळेल त्या भावात कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदयाची आवक होऊ लागली आहे. दरम्यान, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल २५१२ रुपये भाव मिळाला.

Stir in the onion stored in the pan | चाळीत साठवलेल्या कांद्यालाही बाधा

चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा खराब होऊ लागल्याने उमराणे बाजार समितीत कांदा विक्रीसाठी वाहनांची झालेली गर्दी.

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक जिल्हा : बाजार समित्यांमध्ये आवक वाढली

नाशिक : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या उन्हाळी कांद्यास आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने, मिळेल त्या भावात कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदयाची आवक होऊ लागली आहे. दरम्यान, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल २५१२ रुपये भाव मिळाला.
कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या उन्हाळी कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चालूवर्षी बियाणे मिळविण्यापासून ते रोपे टाकण्यापर्यंत तसेच लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी सुरूवातीस बहुतांश शेतकऱ्यांजवळ घरगुती बियाणे असल्याने लवकर रोपे तयार व्हावीत, यासाठी लवकर बियाणे पेरणी केली होती. मात्र, त्यावेळेस सततच्या पावसामुळे ही रोपे उगण्याआधीच खराब झाली होती.
परिणामी दुसर्‍यांदा रोपे तयार करण्यासाठी घरगुती बियाणे शिल्लक नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली होती. परंतु बहुतांश कंपन्यांचे बियाणे खराब निघाल्याने उगवण क्षमतेवर परिणाम होऊन लागवडीवर याचा विपरित परिणाम झाला होता. गारपीट व अवकाळी पावसामुळे ऐन गळतीच्या उंबरठ्यावर असलेल्या कांदा पिकावर अवघ्या आठ दिवसात करपा रोगाने थैमान घातले.
चालू वर्षी उन्हाळी कांदा उत्पादनात घट आली असतानाच उरलेल्या कांद्यांना आगामी काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला होता. परंतु आधीच गारपीट व करपा रोगाने हा कांदा बाधित असल्याने चाळीत टाकून एक ते दीड महिनाही होत नाही तोच चाळीत साठवणूक केलेला कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. उमराणे येथे सोमवारी (दि. ३१) कांदा कमीत कमी ९०० रुपये, जास्तीत जास्त २१५१ रुपये, तर सरासरी १६०० रुपये दराने विकला गेला.

उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बियाणे, तणनाशके, रासायनिक खते, लागवड, निंदणी, कांदा काढणी आदींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. असे असतानाच ऐन कांदा गळतीवेळी अवकाळी पाऊस व करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारभाव वाढेल, या अपेक्षेने चाळीत कांदा साठवणूक केला होता. मात्र, कांदा रोगाने बाधित झाल्याने चाळीतील कांदा लवकर खराब होऊन तो नाईलाजास्तव विक्री करावा लागत आहे.
- संभाजी देवरे, शेतकरी, उमराणे
 

Web Title: Stir in the onion stored in the pan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.