शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

जातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूत : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:51 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले हे सरकारे २०२४ पर्यंत सत्तेवर राहील असे दावे केले जात

ठळक मुद्देजातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूतविधान परिषदेसाठी आघाडीचा मेळावा

नाशिक : भीमा-कोरेगाव असो वा औरंगाबादची दंगल असो, ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ आल्या की दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जात असून, या सर्व घटनांमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्यामुळे पोलीस देखील हतबल होत असल्याची टिका राष्टÑवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले हे सरकारे २०२४ पर्यंत सत्तेवर राहील असे दावे केले जात होते, प्रत्यक्षात हे सरकार नको असे म्हणण्याची वेळ देशातील जनतेवर आली असून, समाजातील प्रत्येक घटकाची सरकारने फसवणूक केल्याची भावना मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे आता हे सरकार घालविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, जीएसटीमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले, महिलांवर अत्याचार होत आहे. बेरोजगारांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला जात आहे. पोलीस भरतीत भ्रष्टाचार होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तर हिमांशू रॉय सारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी आत्महत्या करू लागले आहेत. नगर जिल्ह्यात दिवसा ढवळ्या खून खराबा होत असून, नागपुरात सात दिवसात १२ जणांची हत्या करण्यात आली आहे. आपल्या राजकीय जीवनात ३२ वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती आपण पाहिल्याचेही पवार म्हणाले.राज्यात १४०० कोटी तूर सडत पडली असून नवीन तूर कोठे साठवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले, खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. देशाचा पंतप्रधान निवडणूक प्रचारात खालच्या पातळीवर जावून भाषणे करीत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वत्र भगवेकरण करण्याचा प्रयत्न भाजपा करू लागली आहे. विरोधकांना खोट्या नाट्या गुन्ह्यात अडकविण्याचे मोक्का, तडीपारी करण्याचे उद्योग केले जात असून, भुजबळ सारख्या नेत्यांना विनाकारण २६ महिने तुरूंगात अडकविण्यात आले आहे. भाजपाची वाटचाल सत्तेतून पैसा व पैशांतून दहशत व पुन्हा दहशतीच्या माध्यमातून सत्ता अशा प्रकारे होत असून, असे सरकार आजवर पाहिले नसल्याची टिकाही अजित पवार यांनी केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक