शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूत : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:51 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले हे सरकारे २०२४ पर्यंत सत्तेवर राहील असे दावे केले जात

ठळक मुद्देजातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूतविधान परिषदेसाठी आघाडीचा मेळावा

नाशिक : भीमा-कोरेगाव असो वा औरंगाबादची दंगल असो, ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ आल्या की दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जात असून, या सर्व घटनांमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्यामुळे पोलीस देखील हतबल होत असल्याची टिका राष्टÑवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले हे सरकारे २०२४ पर्यंत सत्तेवर राहील असे दावे केले जात होते, प्रत्यक्षात हे सरकार नको असे म्हणण्याची वेळ देशातील जनतेवर आली असून, समाजातील प्रत्येक घटकाची सरकारने फसवणूक केल्याची भावना मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे आता हे सरकार घालविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, जीएसटीमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले, महिलांवर अत्याचार होत आहे. बेरोजगारांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला जात आहे. पोलीस भरतीत भ्रष्टाचार होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तर हिमांशू रॉय सारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी आत्महत्या करू लागले आहेत. नगर जिल्ह्यात दिवसा ढवळ्या खून खराबा होत असून, नागपुरात सात दिवसात १२ जणांची हत्या करण्यात आली आहे. आपल्या राजकीय जीवनात ३२ वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती आपण पाहिल्याचेही पवार म्हणाले.राज्यात १४०० कोटी तूर सडत पडली असून नवीन तूर कोठे साठवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले, खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. देशाचा पंतप्रधान निवडणूक प्रचारात खालच्या पातळीवर जावून भाषणे करीत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वत्र भगवेकरण करण्याचा प्रयत्न भाजपा करू लागली आहे. विरोधकांना खोट्या नाट्या गुन्ह्यात अडकविण्याचे मोक्का, तडीपारी करण्याचे उद्योग केले जात असून, भुजबळ सारख्या नेत्यांना विनाकारण २६ महिने तुरूंगात अडकविण्यात आले आहे. भाजपाची वाटचाल सत्तेतून पैसा व पैशांतून दहशत व पुन्हा दहशतीच्या माध्यमातून सत्ता अशा प्रकारे होत असून, असे सरकार आजवर पाहिले नसल्याची टिकाही अजित पवार यांनी केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक