शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूत : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:51 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले हे सरकारे २०२४ पर्यंत सत्तेवर राहील असे दावे केले जात

ठळक मुद्देजातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूतविधान परिषदेसाठी आघाडीचा मेळावा

नाशिक : भीमा-कोरेगाव असो वा औरंगाबादची दंगल असो, ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ आल्या की दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जात असून, या सर्व घटनांमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्यामुळे पोलीस देखील हतबल होत असल्याची टिका राष्टÑवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले हे सरकारे २०२४ पर्यंत सत्तेवर राहील असे दावे केले जात होते, प्रत्यक्षात हे सरकार नको असे म्हणण्याची वेळ देशातील जनतेवर आली असून, समाजातील प्रत्येक घटकाची सरकारने फसवणूक केल्याची भावना मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे आता हे सरकार घालविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, जीएसटीमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले, महिलांवर अत्याचार होत आहे. बेरोजगारांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला जात आहे. पोलीस भरतीत भ्रष्टाचार होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तर हिमांशू रॉय सारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी आत्महत्या करू लागले आहेत. नगर जिल्ह्यात दिवसा ढवळ्या खून खराबा होत असून, नागपुरात सात दिवसात १२ जणांची हत्या करण्यात आली आहे. आपल्या राजकीय जीवनात ३२ वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती आपण पाहिल्याचेही पवार म्हणाले.राज्यात १४०० कोटी तूर सडत पडली असून नवीन तूर कोठे साठवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले, खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. देशाचा पंतप्रधान निवडणूक प्रचारात खालच्या पातळीवर जावून भाषणे करीत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वत्र भगवेकरण करण्याचा प्रयत्न भाजपा करू लागली आहे. विरोधकांना खोट्या नाट्या गुन्ह्यात अडकविण्याचे मोक्का, तडीपारी करण्याचे उद्योग केले जात असून, भुजबळ सारख्या नेत्यांना विनाकारण २६ महिने तुरूंगात अडकविण्यात आले आहे. भाजपाची वाटचाल सत्तेतून पैसा व पैशांतून दहशत व पुन्हा दहशतीच्या माध्यमातून सत्ता अशा प्रकारे होत असून, असे सरकार आजवर पाहिले नसल्याची टिकाही अजित पवार यांनी केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक