शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

मालवाहतुकीने एसटी मालामाल; चालक मात्र झाले कंगाल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोनाच्या संकट काळात प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्नाचे पर्याय स्त्रोत शोधले आणि महामंडळाच्या ...

नाशिक : कोरोनाच्या संकट काळात प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्नाचे पर्याय स्त्रोत शोधले आणि महामंडळाच्या तिजोरीला आर्थिक हातभार लावला. एसटीने बसेसेच रूपांतर मालवाहू वाहनात केले, मात्र या मालवाहू बसेस चालविणाऱ्या चालकांना भुर्दंड सोसावा लागला. याकडे महामंडळाने आता कुठे दखल घेतली आहे.

मागीलवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास नऊ महिने महामंडळाची प्रवासी बससेवा बंद करण्यात आलेली होती. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रवासी वाहतूक बंद असल्याने या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाला पॅकेज द्यावे लागले. त्यातून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न काही महिने सुटला असला तरी प्रवासीसंख्या कमी होत असल्याने उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत म्हणून महामंडळाने आपल्या भंगारातील बसेसचे रूपांतर मालवाहू वाहनात केले आणि खासगी व्यावसायिक, उत्पादक, कारखान्यांकडील मालवाहतूक सुरू केली. त्यामुळे महामंडळाला आर्थिक लाभही झाला.

या गाडीवर चालक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या चालकाला मात्र चांगलाच मनस्ताप सोसावा लागला. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालवाहतूक करताना चालकांना प्रसंगी मुक्काम करावा लागला. त्यामुळे मुक्काम तसेच जेवणाचा खर्च वैयक्तिक स्वरूपात करावा लागला. दोन-तीन दिवसांसाठी वेळ लागला तर खर्च अधिक वाढत राहिला. त्यामुळे चालकांना भुर्दंड सोसावा लागला. महामंडळाकडून कोणताही भत्ता दिला जात नसल्याने प्रसंगी ॲडव्हान्स घेण्याची वेळ चालकांवर आली.

--इन्फो--

मालवाहतूक सुरू असलेल्या ट्रक्स

५०

जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक्स

५०

--इन्फो--

कोरोना काळात कोट्यवधींची कमाई

----

जून २०२० ते मे २०२१ या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहू ट्रक्सच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार ४१४७ फेऱ्या करून मालट्रक्सने ३ कोटी, २० लाख, १९ हजार ९२० इतकी कमाई केली. सुमारे १०३८ बसेसची बुकिंग इतर विभागांकडून करण्यात आली होती. त्या माध्यमातून महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले. इतर आस्थापनांनी एसटीच्या मालवाहू बसेसला प्राधान्य देऊन मालवाहतूक करावी, असे आदेश शासकीय विभागांना देण्यात आलेले हेाते. खासगी आस्थापनांनीदेखील कोरोनाच्या काळात एसटीच्या मालवाहतूक ट्रक्सवरच भरवसा टाकल्याने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडली.

--इन्फो--

परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम

महामंडळाच्या मालवाहू ट्रक्सवर चालक म्हणून असलेल्या चालकाला मोठ्या आर्थिक प्रश्नाला सामोरे जावे लागले. बाहेरगावी जावे लागत असतानाही त्यांना जेवण तसेच मुक्कामासाठी कोणताही भत्ता दिला गेला नाही. त्यामुळे खिशातून त्यांना खर्च करावा लागला. काही चालकांना तर पगारातून ॲडव्हान्स घेऊन मालट्रकवर ड्युटी करावी लागली. वेतनातून ॲडव्हान्स कट केला जातो. चालकाला जेवणासाठी आणि राहण्यासाठी स्पेशल असा कोणताही अलाउन्स दिला जात नाही. किलोमीटर तसेच नाईट भत्ता असल्याने वेगळा भत्ता देण्याची गरज नसल्याचे महामंडळाकडून सांगितले जाते. म्हणजे एसटी मालामाल होत असताना चालक मात्र कंगाल होत आहेत.

--इन्फो--

चालक म्हणतात...

चालकांना मालवाहू ट्रक्सची सक्ती केली गेली. वास्तविक अनेक चालक उपलब्ध असतानाही अन्य कुणालाही जबाबादारी देणे शक्य होते. परंतु एखाद्याने ड्युटी नाकारली तर त्याच्यावर कारवाई केली जाते. मालवाहू ट्रकवरील ड्युटी म्हणजे खिशाला कात्री अशी परिस्थिती असल्याने अनेक चालक तयार नसतात.

- किसन बोराळे, एकचालक

मालवाहतूक वाहनावर ड्युटी लागली की आगोदर आपल्याला स्वत:ची तयारी करावी लागते. घरात काटकसर करून घरातून पैसे घेण्याची वेळ अनेकदा आली. पैसे नसल्याने अनेकांना ॲडव्हान्स घ्यावा लागतो. ड्युटीवर जाताना चालक ॲडव्हान्स घेत असेल तर याचा विचार महामंडळाने कारायला हवा.

-- देवीदास मंडलिक

--इन्फो--

ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट

१) दाैऱ्यासाठी ॲडव्हान्स दिला जातो, पण पगारातून ही रक्कम कपात केली जाते. त्यामुळे चालकाला भुर्दंड बसत आहे.

२) नियमाप्रमाणे किलोमीटर तसेच नाईट भत्ता असल्यामुळे इतर भत्ता नाकारला जात असल्याने चालकांमध्ये नाराजी

३) परतीसाठी मालवाहतूक मिळेपर्यंत चालकाला तेथेच थांबावे लागते. त्यामुळे दोन ते तीन दिवसही लागतात.

४) ड्युटी नाकारणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला जात असल्याने चालकांवर दबाव येत आहे.

--इन्फो--

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर अनेकदा आवाज उठविणाऱ्या संघटनांकडून सध्या मौन बाळगले जात आहे. सध्या राज्यात आणि महामंडळात सुरू असलेल्या प्रकरणी कोणतीही संघटना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कुणीही आवाज उठवित नसल्याने चालक-वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांमध्येदेखील नाराजी आहे.