शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:31 IST

मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील महिला गृहपालांची ११६ पदे ही कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थेमार्फत भरण्याच्या निर्णयाविरोधात समाजकल्याण कर्मचाऱ्यांनी पुकारलेले लेखनीबंद आंदोलन समाजकल्याण सचिवांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.

नाशिक : मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील महिला गृहपालांची ११६ पदे ही कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थेमार्फत भरण्याच्या निर्णयाविरोधात समाजकल्याण कर्मचाऱ्यांनी पुकारलेले लेखनीबंद आंदोलन समाजकल्याण सचिवांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कर्मचाºयांनी असहकार पुकारल्यामुळे येथील कामकाजावर परिणाम झाला होता. दरम्यान, आचारसंहितेनंतर होणाºया प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.समाजकल्याण विभागातील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील पदे खासगीकरणातून भरण्याचे आदेश शासनाने काढल्याने गेल्या २५ तारखेपासून राज्यातील समाजकल्याण कर्मचाºयांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. शासनाच्या निर्णयामुळे समाजकल्याण कर्मचाºयांच्या पदोन्नतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. शिवाय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षिततेचा मुद्दादेखील उपस्थित करण्यात येऊन आंदोलनाला सुरुवात झाली होती. सलग तीन दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे समाजकल्याण विभागातील कामकाज ठप्प झाले होते.नाशिकसह राज्यातील समाजकल्याण विभागात आंदोलन सुरू करण्यात आल्याने समाजकल्याण विभागाने या आंदोलनाची दखल घेत संघटनेच्या पदाधिकाºयांशी गेल्या २७ रोजी मुंबईत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी समाजकल्याण सचिवांनी सेवेत असलेल्या पात्र समाजकल्याण निरीक्षक तसेच तत्सम उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, असे सांगून उर्वरित कर्मचाºयांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेतले जाईल. त्यानंतर उर्वरित जागांसाठी जाहिरात काढून अर्ज मागविण्यात येतील व त्यातून उमेदवारांची निवड करण्याचे मान्य केले.आचारसंहिता सुरू असल्याने निर्माण झालेली तांत्रिक अडचण लक्षात घेता सचिवांनी दिलेल्या आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेचे विभागीय सचिव राजेंद्र देवरे यांनी सांगितले. आचारसंहितेनंतर प्रत्यक्षात यासंदर्भात कोणती कार्यवाही केली जाते यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. सध्या सेवेत असलेल्या कर्मचाºयांवर अन्याय होणार नसल्याचे सचिवांनी सांगितल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.सचिवांनी दिलेल्या आश्वासनामुळे तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे. आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय लागलीच होणे शक्य नसल्याने सचिवांनी दिलेल्या आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यात येत आहे. आचारसंहितेनंतर प्रत्यक्षात काय निर्णय घेतला जातो यावर संघटनेची अंतिम भूमिका घेतली जाईल. तूर्तास आंदोलन स्थगित ठेवण्यात आले आहे.  - राजेंद्र देवरे, सचिव, समाजकल्याण विभाग

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार