शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

अवयवदानाच्या प्रचारात सामाजिक संस्थाच पडतात कमी: सुनील देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 11:17 PM

नाशिक : अवयवदान हे श्रेष्ठ दान म्हंटले गेले असले तरी समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. अगदी दशक्रिया विधीच्या दिवशी किर्तन ठेवतानाच अवयवदान हे अन्य कोणाला तरी जीवनदान देणारे ठरू शकेल यासंदभातील व्याख्यान देखील झाले पाहिजे. दुदैवाने यात सामाजिक संस्था देखील कमी पडत आहेत, अशी खंत मृृत्यूंजय आॅर्गन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअंधश्रध्देचा पगडा अधिकअपुऱ्या माहितीमुळे प्रतिसाद कमी

नाशिक: अवयवदान हे श्रेष्ठ दान म्हंटले गेले असले तरी समाजात अवयवदानाविषयी अनेक गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. अगदी दशक्रिया विधीच्या दिवशी किर्तन ठेवतानाच अवयवदान हे अन्य कोणाला तरी जीवनदान देणारे ठरू शकेल यासंदभातील व्याख्यान देखील झाले पाहिजे. दुदैवाने यात सामाजिक संस्था देखील कमी पडत आहेत, अशी खंत मृृत्यूंजय आॅर्गन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील देशपांडे यांनी व्यक्त केले.गेल्या काही वर्षांपासून अवयवदान जनजागृतीसाठी ते महाराष्ट्रात पदयात्रा करत आहेत. यातून आजवर १४५ गावांमध्ये ३५० च्या वर कार्यक्रम घेतले  अवयवदानाच्या प्रचारासाठी महाराष्टÑात पदयात्रा करणारे देशपांडे हे रविवारपासून (दि.५) पुन्हा पदयात्रा सुरू करीत आहेत. त्या संदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- अवयवदान हा शब्द सध्या सुपरिचीत होत आहे. मात्र, त्यानंतरही आवश्यकतेनुसार प्रमाण वाढत नाही, त्यामागची नेमकी कारणे कोणती?देशपांडे- आपण विकसनशील देश असलो तरी अवयवदानात अत्यंत मागे आहोत. त्याची अनेक कारणे अहेत. अंधश्रध्दा, अपुरी माहिती यामुळे प्रतिसाद मिळत नाही. वास्तविक यासंदर्भात देशपातळीवर जागृती झाली पाहिजे, श्रीलंकेत मानवी अवयव ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून ग्राह्य धरली जाते. आपल्याकडे अवयवदानाचे पुरेसे महत्व माहिती नाही, हीच खरी अडचण आहे.

प्रश्न- अवयवदान वाढविण्यासाठी नेमके काय प्रयत्न व्हावेत..देशपांडे- अवयवदानाविषयी आपल्याकडे पुरेशी जागृती नाही नेत्र व त्वचा हे बाह्य अवयव दान करू शकतो. नैसर्गिक मृत्यू आला तर माणसांचे ३ मिनीटात अवयव निकामी होतात. मात्र त्वचा व नेत्र हे सहा तासाच्या आत दान करु शकतो. तसेच देहदान केल्यास याचा फायदा वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होत असतो. १० विद्यार्थ्यांमागे १ देह असणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्तम डॉक्टर तयार होण्यास मदत होते. तसेच कुणाला अवयव दान केल्यास मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तिलाही यामुळे जीवनदान मिळू शकते. हे लोकांना कळले तर पुढिल कामे सोपे होतात. लोकांचा धर्मावर मोठा विश्वास असल्याने त्यांना धार्मिक पद्धतीने समजावून सांगणे महत्वाचे असते. मी करीत असलेल्या पदयात्रा साठीच आहेत. त्यातून काही तरी चांगले बाहेर पडेल अशी अपेक्षा ठेवू या!

मुलाखत- अमोल निरगुडे

टॅग्स :Nashikनाशिकsocial workerसमाजसेवकOrgan donationअवयव दान