शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

गोदापात्र कॉँक्रीटीकरण काढण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या अंगलट

By संजय पाठक | Published: December 14, 2019 4:27 PM

नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू होणारे एकेक प्रकल्प वादग्रस्त ठरत असताना गोदापात्रातील कॉँक्रीटीकरण काढण्याच्य कामाची भर पडण्याच्या आतच हे काम तूर्तास थांबले हे बरेच झाले. नाही तर कंपनीच्या नियोजन नसलेल्या धसमुसळ्या कारभारात आणखी एका प्रकल्पाचे नाव जोडले गेले असते. मुळातच नदी ही केवळ निसर्ग म्हणून बघितली गेली असली तरी त्याच्याशी संबंधीत अनेक भावना जोडल्या गेल्या असतात. त्यामुळे अशाप्रकारचे काम सुरू करण्यापुर्वी भौतिक आणि भावनिक अशा दोन्ही प्रकारचा विचार केला असता तर कंपनीवर अशी नामुष्की आली नसती.

ठळक मुद्देव्यवहार्यता पडताळणी अहवाल नाहीजलसंपदाची परवानगी नाहीजनक्षोभ उसळण्याआधी काम थांबले हे चांगलेच

संजय पाठक, नाशिक-स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू होणारे एकेक प्रकल्प वादग्रस्त ठरत असताना गोदापात्रातील कॉँक्रीटीकरण काढण्याच्य कामाची भर पडण्याच्या आतच हे काम तूर्तास थांबले हे बरेच झाले. नाही तर कंपनीच्या नियोजन नसलेल्या धसमुसळ्या कारभारात आणखी एका प्रकल्पाचे नाव जोडले गेले असते. मुळातच नदी ही केवळ निसर्ग म्हणून बघितली गेली असली तरी त्याच्याशी संबंधीत अनेक भावना जोडल्या गेल्या असतात. त्यामुळे अशाप्रकारचे काम सुरू करण्यापुर्वी भौतिक आणि भावनिक अशा दोन्ही प्रकारचा विचार केला असता तर कंपनीवर अशी नामुष्की आली नसती.

शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतील प्रदुषण हा विषय काही वर्षांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे निर्णय होत असतानाच गोदावरी नदीचे तळाचे कॉँक्रीटीकरण काढण्याचा आणखी एक विषय पुढे आला. त्यानुसार कंपनीने गोदाघाट सुशोभिकरण प्रकल्पाअंतर्गत त्याचा समावेश केला. सदरचे काम शुक्रवारी (दि. १३) सुरू झाले आणि नंतर काही घटकांच्या अंतर्गत विरोधामुळे बंद करावे लागले. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी केल्यानंतर प्रोेजेक्ट गोदाच्या प्रकल्प सल्लागारांना तळ कॉँक्रीटीकरण काढावे काय याबाबत फेरविचार करण्याचे निर्देश देण्यात आल्याने तुर्तास हे काम बंद करण्यात आले आहे.

गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात म्हणजे गांधी तलावापासून पुढे रोकडोबा पर्यंतचे धार्मिक क्षेत्र आहे. महापालिकेने १९९२ नंतर त्यातील काही भागाचे तळ कॉंक्रीटीकरण केले. तर २००३-०४ मधील कुंभमेळ्याच्या वेळी देखील अनेक कुंड एकत्र करून कुंडांचा विस्तार करतानाच तळ कॉंक्रीटीकरण करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक झरे आणि पुरातन कुंड लूप्त झाले हा एक आक्षेप आहे. त्यामुळेच आता गोदाघाटाचे सुशोभिकरण करताना ही लुप्त कुंडे पुन्हा पुनरूज्जीवीत करण्याची मागणी होणे स्वाभाविक आहे. परंतु अशी मागणी केल्यानंतर त्याची संपुर्ण व्यवहार्यता पडताळणी करणे मात्र स्मार्ट सिटी कंपनीची जबाबदारी आहे.

स्मार्ट सिटी कंपनीने यासंदर्भात पर्यावरण प्रेमी देवांग जानी आणि वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राजक्ता बस्ते यांच्याबरोबर बैठका घेतल्या तसेच सर्व प्रत्यक्ष स्थळ पाहणीचे सोपस्कार पार पाडले खरे, परंतु नंतर त्यासंदर्भात व्यवहार्यता पडताळणी आणि कायदेशीर बाबींची पुर्तता करण्याची गरज होती. ती मात्र केली गेली नाही. महापालिका क्षेत्रात नदीकाठ महापािलकेच्या अखत्यारीत येत असेल परंतु नदीपात्र मात्र जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत आहे. पात्रात तळाचे कॉंक्रीटीकरण करताना विचारले नाही तर आता कशाला विचारता असा प्रश्न करीत या विभागाने हात झटकले. तर तळ कॉँक्रीटीकरण काढले आणि त्या जागी कोणत्याही प्रकारचे झरे अथवा पुरातन कुंड आढळले नाहीच तर काय, खर्च वाया गेल्यास दायीत्व कोणाचे याबाबत मात्र कोणतेही उत्तर नाही.

मुळात अशाप्रकारची मागणी आल्यानंतर शासनाच्याच भूजल सर्वेक्षण विभागाकडून पुरातन कुंड किंवा तेथे जलसाठा आहे किंवा नाही याची तपासणी झाली असती आणि त्यानंतर व्यवहार्यता पडताळणी अहवाल करून निर्णय झाला असता तर स्मार्ट सिटीच्या कामांना आधार राहीला असता, परंतु तसे न झाल्याचे कंपनीच अवस्था आ बैल मुझे मार अशी झाली. आता काम स्थगित केल्यानंतर जे शहाणपण कंपनी दाखवत आहे, ते अगोदर दाखवले असते तर अशी स्थिती उदभवली नसती.

गोदावरी ही धार्मिक दृष्टीकोनातून महत्वाची आहे. गांधी तलाव, रामकुंड, लक्ष्मण कुंड अशा अनेक कुंडांची धार्मिक महत्ती आहे. बाराही महिने रामकुंडावर धार्मिक विधीसाठी नागरीक येत असतात. विशेषत: दशक्रिया विधी आणि अस्थी विसर्जनासाठी गर्दी होत असते. अशावेळी कुंडातील तळ कॉंक्रीटीकरण काढण्याच्या निमित्ताने कुंडात पाणीच नसेल तर भाविकांनी काय करायचे असा देखील एक प्रश्न आहे. गोदाकाठी होणारा गोदावरी उत्सव देखील येऊ घातला आहे अशावेळी नदीपात्राशी छेड छाड करण्यापूर्वी कंपनीने ताक फुंकून पिण्याचा निर्णय योग्यच आहे. मुळात स्मार्ट सिटीचे काम आणि दोन अडीच वर्ष थांब अशी अवस्था आहे. शहरात दोन वर्षांपासून खोदून ठेवलेला अवघ्या एक किलो मीटरचा स्मार्ट रोड अजून पुर्ण होऊ शकलेला नाही. रामकुंड परीसराची अशी अवस्था झाली असती तर जनक्षोभ उसळला असता. त्यामुळे झाले ते चांगलेच झाले आता समग्र विचार करून निर्णय घ्यावा, हेच महत्वाचे आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीgodavariगोदावरी