शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

बनावट खते, बियाण्यांचा शोध घेण्यासाठी सोळा भरारी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 6:50 PM

हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे कृषी खात्याच्या नियोजनाला पुरेसा अवधी मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी बाजारात खतांची होत असलेली कृत्रिम टंचाई आता दूर झाल्याने जिल्ह्याने मागणी नोंदविलेल्या खतांच्या तुलनेत ५० टक्के खते आत्ताच प्राप्त

ठळक मुद्देकृषी विभाग : गुरुवारपासून तालुकानिहाय दुकानांची तपासणी

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : मान्सूनचे आगमन तोंडावर आले असून, शेतकऱ्यांकडून खरिपाच्या पेरणीची तयारी केली जात असताना बी-बियाणे व खतांच्या वापरात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सोळा भरारी पथके गठित केली असून, गुरुवारपासून जिल्हाभरात तालुकानिहाय खते, बियाण्यांच्या दुकानांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कापूस व भाताच्या वाणाची प्रामुख्याने तपासणी केली जाणार आहे.

हवामान खात्याने यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे कृषी खात्याच्या नियोजनाला पुरेसा अवधी मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी बाजारात खतांची होत असलेली कृत्रिम टंचाई आता दूर झाल्याने जिल्ह्याने मागणी नोंदविलेल्या खतांच्या तुलनेत ५० टक्के खते आत्ताच प्राप्त झाली असून, बी-बियाण्यांच्या बाबतीतही समाधानकार परिस्थिती असल्याचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यंदा खरिपाचे पीकनिहाय लागवडीचे क्षेत्रही निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पिके घेण्यासाठी लागणाºया बी-बियाण्यांचा सातत्याने आढावा घेतला जात असून, बाजारातून मिळणाºया बियाण्यातून शेतकºयांची फसवणूक होऊ नये यासाठी फर्टिलायझर दुकानात जाऊन तपासणीसाठी नमुने घेण्यात येतील तसेच शासनाने बंदी घातलेल्या बियाणांची विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात सोळा भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकात कृषी अधिकारी, वजनमाप निरीक्षक, कृषी सहायक, ग्रामसेवकाचा समावेश आहे. गुरुवारपासून पथके प्रत्येक तालुकानिहाय फर्टिलायझरच्या दुकानात जाऊन तपासणी करतील. मान्सूनची सुरुवात झाल्यावर पहिल्या पावसानंतर प्रामुख्याने भात व कापसाची लागवड करण्याकडे शेतकºयांचा कल आहे. तो लक्षात घेता, पहिल्या टप्प्यात भात व कापसाचे वाण तपासण्यावर पथकाचा भर असून, त्यातही कापसावर गेल्या काही वर्षांपासून बोंडअळी, तुडतुड्याचा प्रभाव पाहता, यंदा लागवडीपासूनच त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. महाराष्टÑात गुजरात व आंध्र प्रदेशातून कापसाचे वाण येते, नेमके या वाणातूनच शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे आजवरच्या तपासणीअंती निष्पन्न झाल्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही राज्यांतील सीमा तसेच या सीमेला लागून असलेल्या महाराष्टÑातील गावांकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शेतकºयांनीदेखील कृषी अधिकाºयाच्या सल्ल्यानेच बी-बियाणांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद