शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पिंपळगावी शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:36 IST

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम प्रणालीअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत व्यापारी व काही प्रमाणात शेतक-यांनीही या पद्धतीला विरोध करीत अधिका-यांना घेराव घातला.

पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम प्रणालीअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत व्यापारी व काही प्रमाणात शेतक-यांनीही या पद्धतीला विरोध करीत अधिका-यांना घेराव घातला.सकाळी दहा वाजता व्यापारी व काही शेतकºयांच्या उपस्थितीत ई-नाम प्रणाली प्रशिक्षणास पिंपळगाव बाजार समितीच्या सभागृहात प्रारंभ झाला. प्रशिक्षक रंगनाथ कटरे, सभापती आमदार दिलीप बनकर, संचालक सुरेश खोडे, निवृत्ती धनवटे, शंकरलाल ठक्कर, बापूसाहेब पाटील, लक्ष्मण निकम, नारायण पोटे, सचिव संजय पाटील आदींसह पणन विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.प्रशिक्षणादरम्यान कटरे म्हणाले की, ई-नाम प्रणालीनुसार बाजार समितीत शेतमाल विक्र ीसाठी यापुढे शेतकर्यांना आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत शेतकºयांच्याच शेतीमालाचा लिलाव बाजार आवारावर होईल. तसेच शेतमाल खरेदी करणार्या व्यापार्यांना ही नोंदणी आवश्यक असून, नोंदणी केलेले व्यापारीच लिलावात बोली बोलू शकतील. ई-नाम लिलाव पद्धतीनुसार प्रथम शेतकर्यांच्या मालाचा दर्जा ठरवून त्या शेतमालाचा किमान भाव ठरविला जाईल. किमान बाजारभाव ठरल्यानंतरच व्यापाºयांना या शेतमालाची बोली लावता येणार आहे. या पद्धतीतून स्पर्धा होऊन शेतकºयांना चांगला भाव मिळू शकतो. या योजनेद्वारे शेतकर्यांनी आपल्या नावाची नोंदणी एका बाजार समतिीत केली तरी देशभरातील कोणत्याही बाजार समतिीत शेतकरी आपला शेतमाल विक्र ी करू शकतील. तसेच व्यापार्यांनीही आपल्या नावाची नोंदणी केल्यास ते देशातील कोणत्याही बाजार समितीत शेतमाल खरेदी करू शकतील, असे कटरे यांनी स्पष्ट केले.दीड तास चाललेल्या प्रशिक्षण व प्रात्यिक्षकानंतर व्यापारी, शेतकर्यांनी या प्रणालीला कडाडून विरोध केला. या प्रणालीनुसार आम्हास काम करायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडत प्रशिक्षक रंगनाथ कटरे यांना घेराव घातला. त्यामुळे केंद्र सरकारचा ई-नामचा फतवा महाराष्ट्रातील बाजार समितीत कार्यान्वित होतो की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.ई-नामबाबत प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक पणन विभागाचे अधिकारी रंगनाथ कटरे या विरोधामुळे हतबल झाले. त्यांनी सर्व प्रकारे व्यापारी व शेतकºयांना या प्रणालीतील फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशेषत: व्यापाºयांनी विरोधाची ठाम भूमिका घेतली. यावेळी बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर उपस्थित होते. त्यांनीही या पद्धतीस विरोध दर्शविला. बाजार समित्या शेतकर्यांसाठी काम करतात. त्यामुळे शेतकºयांनी ही पद्धत स्वीकारली तर आमची हरकत नाही, असेही बनकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिक