शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 22:01 IST

नाशिक शहरातील अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून राज्य शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील विविध शैक्षणिक संकुलांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शालेय स्तरावरील काही विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशाची माहितीच नसल्याने असे विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. मात्र शाळा व्यावस्थापनांकडून प्रवेशद्वारावर लावलेली सूचना पाहून सर्व विद्यार्थी माघारी परतले. 

नाशिक : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी (दि. १६) शहरातील अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून राज्य शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील विविध शैक्षणिक संकुलांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शालेय स्तरावरील काही विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशाची माहितीच नसल्याने असे विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. मात्र शाळा व्यावस्थापनांकडून प्रवेशद्वारावर लावलेली सूचना पाहून सर्व विद्यार्थी माघारी परतले. शहरातील सर्व शाळांमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शुकशुकाट दिसून आला. महापालिकेच्या ९० प्राथमिक व १३ माध्यमिक शाळांसह खासगी व विनाअनुदानित १७२ अशा सर्व २७५ शाळांनी प्रवेशद्वारावरच सुटी असल्याचे फलक लावले होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी (दि. १४) सायंकाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारची सुटी असल्याने शाळा प्रशासन विद्यार्थी व पालकांना याबाबत सूचना देऊ शकले नव्हते. त्यामुळे या आदेशाविषयी अनभिज्ञ पालक सोमवारी सकाळी त्यांच्या घेऊन शाळेत आले. शाळा बंद अशल्याची माहिती मिळताच ते माघारी परतले. शैक्षणिक संस्थांनी एसएमएस, ई-मेल, व्हॉट््सअ‍ॅप व इतर सोशल माध्यमांद्वारे पालक व विद्यार्थ्यांना शाळा बंद राहणार असल्याची माहिती विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला असतानाही काही पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन याबाबत शहानिशा करून घेतली. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली असली तरी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सुरक्षारक्षकांना सुटी देण्यात आलेली नसल्याने शाळांचे शिक्षणेत्तर सर्व कामकाज नियमितपणे सुरू होते. 

विद्यापीठांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगितकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यशासनाने १७ ते ३१ मार्च दरम्यान विद्यापीठांच्या होणाऱ्या सर्व लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा स्थगित  करण्याचे आदेश सोमवारी दिले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबतचे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना सूचित करतानाच १ एप्रिल २०२० पासूनच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांमधील सुमारे २७ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी