शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 22:01 IST

नाशिक शहरातील अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून राज्य शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील विविध शैक्षणिक संकुलांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शालेय स्तरावरील काही विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशाची माहितीच नसल्याने असे विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. मात्र शाळा व्यावस्थापनांकडून प्रवेशद्वारावर लावलेली सूचना पाहून सर्व विद्यार्थी माघारी परतले. 

नाशिक : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी (दि. १६) शहरातील अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून राज्य शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील विविध शैक्षणिक संकुलांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शालेय स्तरावरील काही विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशाची माहितीच नसल्याने असे विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. मात्र शाळा व्यावस्थापनांकडून प्रवेशद्वारावर लावलेली सूचना पाहून सर्व विद्यार्थी माघारी परतले. शहरातील सर्व शाळांमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शुकशुकाट दिसून आला. महापालिकेच्या ९० प्राथमिक व १३ माध्यमिक शाळांसह खासगी व विनाअनुदानित १७२ अशा सर्व २७५ शाळांनी प्रवेशद्वारावरच सुटी असल्याचे फलक लावले होते. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी (दि. १४) सायंकाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारची सुटी असल्याने शाळा प्रशासन विद्यार्थी व पालकांना याबाबत सूचना देऊ शकले नव्हते. त्यामुळे या आदेशाविषयी अनभिज्ञ पालक सोमवारी सकाळी त्यांच्या घेऊन शाळेत आले. शाळा बंद अशल्याची माहिती मिळताच ते माघारी परतले. शैक्षणिक संस्थांनी एसएमएस, ई-मेल, व्हॉट््सअ‍ॅप व इतर सोशल माध्यमांद्वारे पालक व विद्यार्थ्यांना शाळा बंद राहणार असल्याची माहिती विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला असतानाही काही पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन याबाबत शहानिशा करून घेतली. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली असली तरी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सुरक्षारक्षकांना सुटी देण्यात आलेली नसल्याने शाळांचे शिक्षणेत्तर सर्व कामकाज नियमितपणे सुरू होते. 

विद्यापीठांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगितकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यशासनाने १७ ते ३१ मार्च दरम्यान विद्यापीठांच्या होणाऱ्या सर्व लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा स्थगित  करण्याचे आदेश सोमवारी दिले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबतचे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना सूचित करतानाच १ एप्रिल २०२० पासूनच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांमधील सुमारे २७ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी